शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Bipin Rawat: CDS बिपिन रावत यांच्यापूर्वी 'या' ६ महत्त्वाच्या व्यक्तींचा विमान अपघातांत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 05:26 IST

संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली.

नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टरच्या गंभीर अपघातात देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत आहे. भारतात या आधीही असे अपघात घडले आहेत, ज्यात महत्त्वाच्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.  

संजय गांधीमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि राजीव गांधी यांचे धाकटे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे त्यावेळी देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली. ही दुर्घटना २३ जून १९८० रोजी घडली. हे विमान संजय गांधी स्वत: चालवत होते.

माधवराव शिंदेकाँग्रेसचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते माधवराव शिंदे यांचाही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात २००१ मध्ये सप्टेंबर महिन्यात झाला. माधवराव शिंदे तेथून एका सभेसाठी कानपूरला निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य पाच जण होते. या अपघातात सर्व सहाजणांचा मृत्यू झाला.

वाय. एस. राजशेखर रेड्डीआंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि अन्य चारजणांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर नल्लामाला या वनक्षेत्रात गायब झाले. हा प्रकार २००९ मध्ये सप्टेंबरमध्ये घडला. लष्कराच्या मदतीने या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात आला. तीन सप्टेंबर रोजी या हेलिकॉप्टरचे अवशेष कुरनूलपासून ७४ किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्रकोंडा या टेकडीवर आढळून आले.

दोरजी खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचाही मृत्यू एप्रिल २०११ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात झाला. हेलिकॉप्टरमधून दोरजी खांडू यांनी तवांग येथून उड्डाण केले होते. २० मिनिटांनंतर या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याचे लक्षात आले. चार दिवस या हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा  लागला नव्हता. पाचव्यादिवशी बचावपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आणि त्यात पाचजणांचे मृतदेह आढळून आले.

जी. एम. सी. बालयोगीलोकसभेचे माजी अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांचाही मार्च २००२ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यात झाला. बेल-२०६ या प्रकारातील खासगी हेलिकॉप्टरने बालयोगी त्यांचे सहायक आणि अंगरक्षकासह बसले होते. काही तांत्रिक बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यात बालयोगी मरण पावले.

ओ. पी. जिंदालप्रख्यात उद्योगपती आणि राजकीय नेते ओ. पी. जिंदाल यांचाही विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरिंदर सिंह आणि पायलटचाही मृत्यू झाला. चंदीगडहून हेलिकॉप्टरने दिल्लीला येत असताना एप्रिल २००५ मध्ये हा अपघात झाला.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत