बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:53 IST2025-10-24T13:53:22+5:302025-10-24T13:53:48+5:30

Kurnool Bus Fire Accident: आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात हैदराबादहून बंगळूरला जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला आग लागून २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Bike stuck under bus, fire breaks out, doors open... 20 passengers burn to death! What exactly happened? | बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?

बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?

Kurnool Bus Fire Accident:आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात हैदराबादहून बंगळूरला जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला आग लागून २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिन्ना टेकुरु गावाजवळ ही घटना घडली असून, अपघातानंतर बसचे ऑटोमॅटिक दरवाजे जाम झाल्याने अनेक प्रवासी आतच अडकले. अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमके कारण काय?

पहाटे सुमारे ३:३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कावेरी ट्रॅव्हल्सच्या व्होल्वो बसमध्ये दोन चालकांसह एकूण ४१ प्रवासी होते. बसची एका मोटारसायकलला धडक बसली. धडकेनंतर मोटारसायकल बसच्या खाली अडकली. यावेळी मोटारसायकलमधून पेट्रोल गळती झाली आणि आग लागली. आग वेगाने बसच्या पुढील भागातून पसरली, ज्यामुळे अनेक लोक आत अडकले.

दरवाजे जाम, उघडण्याचाही पर्याय नव्हता!

कुरनूलच्या डीसी सिरी यांनी सांगितले की, दुर्घटना मध्यरात्रीच्या वेळी झाल्यामुळे प्रवासी गाढ झोपेत होते. अपघातानंतर बसचे ऑटोमॅटिक दरवाजे आणि वायरिंग वितळल्यामुळे दरवाजे उघडले नाहीत. एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, बसचे दरवाजे किंवा खिडक्या तोडण्यासाठी कोणतेही सुरक्षा हातोडे उपलब्ध नव्हते.

पोलिसांच्या माहितीनुसार, १२ प्रवासी खिडक्या आणि आपत्कालीन दरवाजा तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण ते देखील भाजले आहेत. जखमींना तातडीने कुरनूल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेवेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता, ज्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले.

ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली

डीआयजी कोया प्रवीण यांनी सांगितले की, मोटारसायकलच्या धडकेमुळे आग लागली आणि बसमध्ये असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे ती अधिक भडकली. मात्र, बसची इंधन टाकी सुरक्षित होती. त्यांनी पुढे सांगितले की, बसमध्ये अशा घटनांना रोखण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय नव्हते. आतापर्यंत २१ लोकांचा शोध लागला आहे. उर्वरित २० पैकी ११ मृतदेहांची ओळख पटली आहे, तर ९ मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

तपास आणि पुढील कारवाई

अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मृतांची अंतिम संख्या अद्याप निश्चित व्हायची आहे. बसने अग्निसुरक्षा मानकांचे पालन केले होते की नाही आणि यामध्ये काही निष्काळजीपणा होता का, याबाबत अधिकारी तपास करत आहेत.

Web Title : बस में आग लगने से 20 की मौत; दरवाजे जाम

Web Summary : आंध्र प्रदेश में बस में आग लगने से 20 यात्रियों की मौत हो गई। बस एक बाइक से टकरा गई, जिससे आग लग गई और दरवाजे जाम हो गए। 12 लोग बच गए, कई घायल; जांच जारी।

Web Title : Bus Fire Kills 20 After Crash; Doors Jammed Shut

Web Summary : Andhra Pradesh bus fire kills 20 bound for Bangalore after colliding with a bike. Fuel ignited the blaze, trapping passengers as doors failed. Twelve escaped, many injured; investigation underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.