शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

Assam Floods : भीषण! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 9 जिल्ह्यांतील 34 हजार लोकांना फटका, 523 गावं पाणीखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 5:48 PM

Assam Floods : सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

आसाममधील अनेक ठिकाणी रात्रभर पडलेल्या पावसानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या नऊ जिल्ह्यांमध्ये 34,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूतान सरकार आणि भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्याच्या वरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील 'रेड अलर्ट' जारी केला आणि येत्या काही दिवसांत आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार' पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुवाहाटी येथील IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) मंगळवारपासून 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, त्यानंतर बुधवारी 'ऑरेंज अलर्ट' आणि गुरुवारी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

एएसडीएमएच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, बाक्सा, बारपेटा, दरांग, डिब्रुगढ, कोकराझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुरामुळे सुमारे 34,100 लोक प्रभावित झाले आहेत. लखीमपूरला सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे 22,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यानंतर डिब्रुगडमध्ये सुमारे 3,900 आणि कोकराझारमध्ये 2,700 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. 

प्रशासन कोकराझारमध्ये एक मदत शिबिर चालवत आहे जिथे 56 लोकांनी आश्रय घेतला आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये 24 मदत वितरण केंद्र देखील आहे.ASDMA ने म्हटले आहे की सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बारपेटा, सोनितपूर, बोंगाईगाव, धुबरी, डिब्रुगड, गोलाघाट, कामरूप, मोरीगाव, नलबारी, शिवसागर आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले आहे. कछार, दिमा हासाओ आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

 

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस