शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

घर-शौचालय-रस्ता-नोकरी मोदींकडून मिळवलं, पण मतदान काँग्रेसला केलं...; CM सरमा यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 15:57 IST

सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. बांगलादेशी वंशाच्या अल्पसंख्यक समुदायावर हल्ला चढवताना सरमा म्हणाले, या समाजातील लोकांना घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन आणि दरमहा १२५० रुपये मोदी सरकारकडून मिळाले. मात्र, त्यांनी मतदान काँग्रेसला केले. कारण त्यांना तुष्टीकरण हवे आहे. एवढेच नाही तर, त्यांचा उद्देश विकास नव्हे, तर मोदींना हटवून आपल्या समाजाचा दबदबा कायम ठेवणे होता, असेही सरमा म्हणाले, ते शनिवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

सरमा पुढे म्हणाले, आसाममधील हा एकमेव समाज आहे, जो सांप्रदायिकतेत अडकलेला आहे. यावरून सिद्ध होते की, हिंदू समाज सांप्रदायिकतेत अडकलेला नाही. आसाममध्ये सांप्रदायिकतेत कुणी अडकलेले असेल, तर तो केवळ एकच समाज आहे.

आसाममध्ये NDA ला 11 जागा - आसाममध्ये NDA ने 14 पैकी 11 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना केवळ तीन जागाच मिळाल्या. मतांच्या टक्केवारीचा विचार करता, एनडीएला 47 टक्के तर I.N.D.I.A. ला 39 टक्के मते मिळाली. यावर बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, काँग्रेसच्या 39 टक्के मतांचे विश्लेषण केल्यास, हे संपूर्ण राज्यातून मिळालेले नाही. यातील 50 टक्के मते ही अल्पसंख्यक बहूल अशा 21 विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत, या भागांत भाजपला केवळ ३ टक्के मते मिळाली आहेत.

तीन गांधी आधीच लॉन्च झालेले आहेत - तत्पूर्वी, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारणातील एन्ट्रीसंदर्भात प्रश्न केला असता सरमा म्हणाले होते, तीन गांधी तर आधीच लॉन्च झालेले आहेत. रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या मुलांनीही लवकरच राजकारणात यावे, अशी माझी इच्छा आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस