शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal : Video - "गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, भीती"; अरविंद केजरीवालांचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:01 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपचे अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी राज्यात पक्षाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नवीन कार्यकर्त्यांना जोडणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. अहमदाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"गुजरातमध्ये भीतीचं वातावरण"

अरविंद केजरीवाल म्हणाले की, "भाजपाने गेल्या ३० वर्षांपासून गुजरातवर राज्य केलं आहे. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी त्यांनी ती अधिकच बिघडवली आहे. आज राज्यात सर्वत्र भीती आणि दहशतीचं वातावरण आहे. याच कारणामुळे लोक आता आम आदमी पार्टीकडे 'बदलाचा पर्याय' म्हणून पाहत आहेत."

"जनता आमच्याकडे येतेय"

टीका करताना केजरीवाल म्हणाले, "गेल्या ३० वर्षात भाजपाने गुजरातला दरीत ढकललं आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि भीती आहे. जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, त्यांना घाबरवलं आणि धमकावलं जाते. प्रसंगी तुरुंगात टाकलं जातं. भाजपा उघडपणे भ्रष्टाचार करत आहे आणि त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवू शकत नाही. अशा परिस्थितीत लोक मोठ्या आशेने 'आप'कडे बघत आहेत."

जनतेचा 'आप'वर विश्वास 

केजरीवाल यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीबद्दल सांगितलं की, "गेल्या ६-७ महिन्यांपासून आम आदमी पार्टी संपूर्ण राज्यात रॅली काढत आहे. आमच्याकडे पैसे नाहीत, आमचा पक्ष गरीब आहे. मात्र लोक स्वतः पैसे खर्च करून आमच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. लोकांना आता काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. जनतेला आता भाजपाला सक्षम पर्याय म्हणून फक्त आम आदमी पार्टीच दिसत आहे."

मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य 

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावरूनही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, "इतक्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करूनही ते बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. यावरून हे स्पष्ट होतं की जनता त्यांच्या विरोधात आहे, पण भाजपा सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर करत आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Kejriwal slams BJP: Corruption, fear rampant in Gujarat.

Web Summary : Arvind Kejriwal, on Gujarat tour, attacked BJP, alleging rampant corruption and fear. He claimed people see AAP as an alternative, disillusioned with BJP's 30-year rule and Congress's failures. He also criticized BJP's use of government machinery in elections.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारणGujaratगुजरात