शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:42 IST

Pahalgam Terror Attack : राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांचंही नुकसान होत आहे. भारताने पाकिस्तानी व्हिसावर राहणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नागरिक भारत सोडून गेले आहेत. राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

एएनआयशी बोलताना राजौरी येथील अंजुम तनवीर म्हणाला की, "माझं लग्न २०२० मध्ये झालं. माझी पत्नी कायदेशीररित्या व्हिसावर राहते. आम्ही दरवर्षी व्हिसासाठी अर्ज करायचो आणि तो वाढवला जात असे. पण यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घातली आहे. माझी पत्नी पाकिस्तानात गेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हालाही दुःख झालं आहे." 

"सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा"

"आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आम्ही नेहमीच सैन्याला सहकार्य करत असतो.  जर सरकारने आम्हाला सैन्यात भरती केलं तर आम्ही बॉर्डरवर लढू." आपल्या गर्भवती पत्नीचा उल्लेख करताना तन्वीर म्हणाला, “सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. जे बेकायदेशीरपणे राहत होते त्यांच्यासाठी हे ठीक आहे, परंतु ज्यांचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे. माझी मुलगी रडत आहे आणि ती आजारी आहे. मला खूप त्रास होत आहे."

"आम्ही भारताचं मीठ खाल्लं"

"जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध लढायचं असेल तर ते करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कुटुंबातील एका सदस्याशिवाय पाकिस्तानशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही भारताचं मीठ खाल्लं आहे, आम्ही दुसऱ्या कोणाच्या बाजूने कसे असू शकतो? सरकारने याचा विचार करावा. माझी पत्नी गर्भवती आहे, जर काही झालं तर ती सरकारची चूक असेल." जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.  यानंतर सरकारने अनेक कठोर पावले उचलली आहेत.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला