शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:42 IST

Pahalgam Terror Attack : राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांचंही नुकसान होत आहे. भारताने पाकिस्तानी व्हिसावर राहणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नागरिक भारत सोडून गेले आहेत. राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

एएनआयशी बोलताना राजौरी येथील अंजुम तनवीर म्हणाला की, "माझं लग्न २०२० मध्ये झालं. माझी पत्नी कायदेशीररित्या व्हिसावर राहते. आम्ही दरवर्षी व्हिसासाठी अर्ज करायचो आणि तो वाढवला जात असे. पण यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घातली आहे. माझी पत्नी पाकिस्तानात गेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हालाही दुःख झालं आहे." 

"सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा"

"आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आम्ही नेहमीच सैन्याला सहकार्य करत असतो.  जर सरकारने आम्हाला सैन्यात भरती केलं तर आम्ही बॉर्डरवर लढू." आपल्या गर्भवती पत्नीचा उल्लेख करताना तन्वीर म्हणाला, “सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. जे बेकायदेशीरपणे राहत होते त्यांच्यासाठी हे ठीक आहे, परंतु ज्यांचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे. माझी मुलगी रडत आहे आणि ती आजारी आहे. मला खूप त्रास होत आहे."

"आम्ही भारताचं मीठ खाल्लं"

"जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध लढायचं असेल तर ते करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कुटुंबातील एका सदस्याशिवाय पाकिस्तानशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही भारताचं मीठ खाल्लं आहे, आम्ही दुसऱ्या कोणाच्या बाजूने कसे असू शकतो? सरकारने याचा विचार करावा. माझी पत्नी गर्भवती आहे, जर काही झालं तर ती सरकारची चूक असेल." जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.   

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला