शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:42 IST

Pahalgam Terror Attack : राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांचंही नुकसान होत आहे. भारताने पाकिस्तानी व्हिसावर राहणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नागरिक भारत सोडून गेले आहेत. राजौरी येथील अंजुम तनवीरने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केलं आहे. आता तनवीरला त्याच्या पत्नीची काळजी वाटते. त्याने आपली पत्नी परत यावी यासाठी सरकारला आवाहन केलं आहे.

एएनआयशी बोलताना राजौरी येथील अंजुम तनवीर म्हणाला की, "माझं लग्न २०२० मध्ये झालं. माझी पत्नी कायदेशीररित्या व्हिसावर राहते. आम्ही दरवर्षी व्हिसासाठी अर्ज करायचो आणि तो वाढवला जात असे. पण यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घातली आहे. माझी पत्नी पाकिस्तानात गेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हालाही दुःख झालं आहे." 

"सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा"

"आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आम्ही नेहमीच सैन्याला सहकार्य करत असतो.  जर सरकारने आम्हाला सैन्यात भरती केलं तर आम्ही बॉर्डरवर लढू." आपल्या गर्भवती पत्नीचा उल्लेख करताना तन्वीर म्हणाला, “सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. जे बेकायदेशीरपणे राहत होते त्यांच्यासाठी हे ठीक आहे, परंतु ज्यांचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे. माझी मुलगी रडत आहे आणि ती आजारी आहे. मला खूप त्रास होत आहे."

"आम्ही भारताचं मीठ खाल्लं"

"जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध लढायचं असेल तर ते करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कुटुंबातील एका सदस्याशिवाय पाकिस्तानशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही भारताचं मीठ खाल्लं आहे, आम्ही दुसऱ्या कोणाच्या बाजूने कसे असू शकतो? सरकारने याचा विचार करावा. माझी पत्नी गर्भवती आहे, जर काही झालं तर ती सरकारची चूक असेल." जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.   

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला