शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

..तर गंगा पाच वर्षात स्वच्छ होईल!

By admin | Updated: September 14, 2014 02:54 IST

मनात आणले तर गंगा नदी स्वच्छ करणो हे फार मोठे काम नाही. गंगा नदी स्वच्छ करणो अगदी साधे, सोपे आणि सरळ आहे. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ हवी.

- डॉ. राजेंद्र सिंह 
मनात आणले तर गंगा नदी स्वच्छ करणो हे फार मोठे काम नाही. गंगा नदी स्वच्छ करणो अगदी साधे, सोपे आणि सरळ आहे. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ हवी. आणि नुसती राजकीय इच्छाशक्ती कामाची नाहीतर सर्वसामान्य नागरिकांनाही याकामी पुढाकार घेत थोडीशी तरी जाण बाळगली तर पुढच्या दहा काय पाच वर्षात गंगा नदी सहज स्वच्छ होईल.
 
गंगा नदीच्या शुद्धीकरणाचे काम याच गतीने होत राहिले तर पुढच्या दोनशे वर्षातदेखील ती शुद्ध होणार नाही, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली. येथे विशेष उल्लेख करण्यासारखी बाब अशी की, सर्वोच्च न्यायालय असेही म्हणाले की, गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल या भाषेत सादर करावा.  यातच सारेकाही आले. त्यांना सर्वसामान्य माणूस अभिप्रेत आहे. गंगा नदी स्वच्छ राहावी म्हणून आम्ही पूर्वीपासूनच काम करीत आहोत. त्यासाठी आम्ही ‘गंगा वॉरिअर्स’ ही स्थापन केले. पण हे करताना आम्ही सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवले. गंगा शुद्धीकरणादरम्यान सर्वसामान्यांना काय अभिप्रेत आहे? त्यांनी काय करावे, हे उद्देश सांगितले. हे सांगताना आम्ही त्यांना गंगेचे महत्त्वही पटवून दिले.
गंगेची जमीन म्हणजे गंगेचे पात्र तिचेच राहावे यासाठी सर्वप्रथमत: आपण म्हणजे सरकारने काम केले पाहिजे. मुळात गंगेच्या पात्रचीच काळजी घेतली जात नाही हे दुर्दैव आहे. गंगेची जमीन गंगेच्या कामी आली पाहिजे. गंगेच्या पात्रत अनधिकृत बांधकामे होणार नाहीत; यासाठी सर्वप्रथमत: गंगा नदी ज्या-ज्या राज्यांतून वाहते; त्या-त्या राज्यांतील सरकारने पुढाकार घेतला पाहिजे; आणि मग केंद्र सरकारने याकामी त्यांना मदत केली पाहिजे. नुसत्या अनधिकृत बांधकामांवर थांबता कामा नये. गंगा नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तिला नाल्यांपासून तोडले पाहिजे. म्हणजे नाल्यातील प्रदूषित पाणी तिच्या प्रवाहात सोडता कामा नये. गंगेला अनेक प्रदूषित नाले मिळत आहेत. परिणामी गंगा प्रदूषित होते आहे. म्हणून नाल्यांमधील प्रदूषित पाणी तिच्यामध्ये सोडता कामा नये. रासायनिक कारखान्यांतील रसायनमिश्रित पाणीसुद्धा तिच्यामध्ये सोडता कामा नये. यासाठी केंद्र सरकार जबाबदार असले तरी पहिल्यांदा राज्य सरकार जबाबदार आहे.
आपण केंद्र आणि राज्य सरकार यांना जबाबदार धरताच कामा नये. असे करून आपण आपल्यावरील जबाबदारी झटकतो. केंद्रासह राज्यावर टीका करून आपण आपले हात वर करतो. असे होता कामा नये. गंगा नदी स्वच्छ करायची असेल तर केंद्रासह राज्य सरकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी याकामी पुढाकार घेतला पाहिजे. गंगेचे संवर्धन करायचे म्हणजे काय करायचे? तिची ओळख पटवून द्यायची म्हणजे काय करायचे? तिचे पंजीकरण करायचे म्हणजे काय करायचे? आणि तिचे सीमांकन करायचे म्हणजे काय करायचे? या सगळ्या गोष्टी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगणो हा गंगा शुद्धीकरणातील पहिला टप्पा आहे. आणि पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला की साहजिकच पुढची प्रक्रिया सहज पार पडते.
दुसरा टप्पा असा की आपण नद्यांचे पाणी अडवून ठेवण्यासाठी नद्यांवर बांध बांधतो. ही गोष्ट चुकीची आहे. नदीला नेहमी वाहते राहू द्या. तिच्या पाण्याचा प्रवाह अडवू नका. नदीचा जो पर्यावरणीय प्रवाह आहे. जो नैसर्गिक प्रवाह आहे. तो कायम राहू द्या. आपण नद्यांचे पाणी अडवून ठेवण्यासाठी नद्यांवर बांध बांधतो. येथेच आपण चुकतो. सर्व नद्यांबाबत हे लागू होते, तेच गंगेबाबतही लागू होते. गंगेचे पाणी अडवून ठेवू नका; असे मी स्वत: कित्येक वर्षापासून सांगतो आहे. पण मी एकटय़ाने सांगून काही होणार नाही. समाजाचे मानसशास्त्र वेगळे असते. समाजाला समाजाची भाषा माहीत असते आणि समजते. समाजाला समाजाच्या भाषेत समजावून सांगितले की ते त्यांना पटते. त्यामुळे गंगेचे नैसर्गिक, पर्यावरणीय स्वरूप कायम ठेवले तर आपण अर्धी लढाई जिंकलेली असेल.
आता तिसरा टप्पा असा की, आपण नद्यांच्या खोलीकरणाच्या आणि रुंदीकरणाच्या भानगडीत पडतो. मुळात असे होताच कामा नये. मी यापूर्वीच म्हटले की नदीचे नैसर्गिक आणि पर्यावरणीय स्वरूप कायम राहू द्या. मुंबईतल्या मिठी नदीबाबत आपण हेच केले. तिच्या खोलीकरणासह तिच्या रुंदीकरणाच्या भानगडीत आपण पडलो. हे साफ चुकीचे आहे. गंगेच्या भोवताली बांधकाम नको. तिच्या पात्रत अडथळे नको. तिच्या खोलीकरणाची भानगड नको. आणि तिच्या रुंदीकरणात आपण पडता कामा नये. असे झाले किंवा असे केले तर आपण नदीच्या मूळ प्रवाहात अडथळा आणतो आणि सर्वस्व गमावून बसतो.
चौथा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असा की, गंगा नदीला स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध बनवायचे असेल तर ‘गंगा संरक्षण कायदा’ बनविणो गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही की गंगेच्या शुद्धीकरणासाठी इतर प्राधिकरणो नकोत. तीही गरजेची आहेत. कारण गंगा नदीशी संबंधित असलेली प्राधिकरणो त्यांच्या त्यांच्या परीने काम करीत राहतील. पण ‘गंगा संरक्षण कायदा’ मोलाची भूमिका बजावेल. आणि दुसरी गोष्ट ती अशी की; समाजातील संत, वैज्ञानिक आणि विद्यार्थी या तीन घटकांनी गंगेच्या शुद्धीकरणासाठी पुढे आले पाहिजे. वैज्ञानिकांनी त्यांच्या त्यांच्या परीने गंगेला स्वच्छ करण्यासाठी काम केले पाहिजे. विद्याथ्र्यानी याबाबत देश आणि राज्य पातळीवर जनजागृती केली पाहिजे. नुसती जनजागृती करून थांबता कामा नये तर कार्यान्वितही झाले पाहिजे. आणि संतांनी संतांच्या भाषेत सर्वसामान्यांना गंगेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. हे तीन घटक एकत्र आले तर साहजिकच गंगा सहज शुद्ध आणि स्वच्छ होईल. सरतेशेवटी एवढेच की, गंगेचे पाणी प्रदूषित झाले म्हणून कोणा एकाला जबाबदार धरता कामा नये. गंगा नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, वैज्ञानिक, संत, विद्यार्थी आणि समाज असे सर्व घटक एकत्र आले आणि काम सुरू केले तर दहा नाही तर पुढील पाच वर्षात गंगा स्वच्छ आणि शुद्ध होईल.
(लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)
(शब्दांकन : सचिन लुंगसे)