दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:57 IST2025-06-18T11:55:45+5:302025-06-18T11:57:24+5:30

Air India: एअर इंडियाने निवेदन जारी करुन गैरसोईबद्दल खेद व्यक्त केला.

Air India flight from Delhi to Bali returns; Decision taken due to volcanic eruption | दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

Air India: अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया एअरलाईन चर्चेत आहे. त्या घटनेनंतर एअर इंडियाची अनेक उड्डाणे विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत किंवा उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग करावी लागली आहे. अशातच आता दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान AI2145 अर्ध्या वाटेतून परतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या विमानतळावर विमान उतरणार होते, त्या विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...

एअर इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले की, 'आज(१८ जून २०२५) रोजी बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे दिल्लीहून बालीला जाणारे विमान AI2145 दिल्लीला परतले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले असून, सर्व प्रवासीदेखील सुरक्षित आहेत.'

एअरलाइनने निवेदनात प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि म्हटले की, 'विमान माघारी परतल्यामुळे प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. गैरसोय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.' याशिवाय, कंपनीने प्रवाशांना तिकीट रद्द केल्यास किंवा त्यांच्या पसंतीनुसार वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेडीची ऑफरदेखील दिली आहे.

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

खराब हवामानामुळे १४ उड्डाणे वळवण्यात आली
दरम्यान, काल(मंगळवारी) संध्याकाळी खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर १४ उड्डाणे वळवण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भोपाळला सहा, चंदीगडला तीन, अमृतसरला दोन, अहमदाबाद, वाराणसी आणि लखनऊला प्रत्येकी एक उड्डाण पाठवण्यात आले.

Web Title: Air India flight from Delhi to Bali returns; Decision taken due to volcanic eruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.