शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

Rajya Sabha Election: ६ लाख मतांनी पराभूत झालेल्या व्यक्तीवर पक्ष मेहरबान का?; सोनिया गांधींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 16:40 IST

मुरादाबाद येथून ६ लाखांच्या मतांनी हरल्यानंतरही इम्रान प्रतापगढी यांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. अलीकडेच ते पक्षाशी जोडले. मुरादाबाद येथे ६ लाख मतांनी पडले. आतापर्यंत एकही नगरपालिका निवडणूक जिंकली नाही.

नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीच्या पूर्वीच काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खदखद बाहेर पडत आहे. राज्यसभेत काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारीवरून पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. त्याआधी पवन खेडा, नगमा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यसभेचं तिकीट न मिळाल्याने विरोध दर्शवला आहे. 

काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पार्टीने पी चिंदबरम यांना तामिळनाडू, जयराम रमेश यांना कर्नाटक, राजीव शुक्ला छत्तीसगड, प्रमोद तिवारी राजस्थान आणि इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राच्या कोट्यातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, दिल्लीत बोझा-बिस्तरा उचलणाऱ्यांना मुख्यपदावर नियुक्त केले जाते. 

मुरादाबाद येथून ६ लाखांच्या मतांनी हरल्यानंतरही इम्रान प्रतापगढी यांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. अलीकडेच ते पक्षाशी जोडले. मुरादाबाद येथे ६ लाख मतांनी पडले. आतापर्यंत एकही नगरपालिका निवडणूक जिंकली नाही. तरीही अल्पसंख्याक विभागाचं अध्यक्षपद सोपवले आणि आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. एका व्यक्तीवर पक्षाची एवढी मेहरबानी का? यांच्या शायरीत इतकी खुबी आहे की अन्य योग्य नेत्यांच्या कतृत्वाचा विसर पडेल? असा सवाल त्यांनी विचारला. 

यापुढे पत्रात लिहिलंय की, याचप्रकारे पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धूला प्रदेशाध्यक्ष बनवण्याची चुकी केली. सिद्धूही इम्रानप्रमाणे शायरी करत होते. पक्षाचं पद मिळवण्यासाठी शायरी येणं गरजेचे आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेते अपमानित होत आहेत. आता पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे पाहत नाहीत असं त्यांनी सांगितले आहे. 

 

डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामाराज्यसभा उमेदवारीत शब्द न पाळल्याने नाराज झालेले डॉ. आशिष देशमुख काँग्रेसमध्ये पदाचा राजीनामा देत असले तरी पक्षात राहून काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अनेक सक्षम उमेदवार असताना पक्षाने राज्याबाहेरचा उमेदवार दिल्याने ही नाराजी आहे. भाजपातून बाहेर पडल्यानंतर देशमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी त्यांनी आमदारकीही पणाला लावली. खुद्द पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशमुखांना राज्यसभेच्या जागेचं आश्वासन दिले होते मात्र ते पाळलं नाही असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.  

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाSonia Gandhiसोनिया गांधी