शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:21 IST

Ahmedabad Air india Plane Crash report: अहमदाबादेतील एआय १७१ विमान अपघात; एएआयबीच्या प्राथमिक चाैकशी अहवालातील संकेत, मात्र अनेक मुद्द्यांचे स्पष्टीकरणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमान १७१ मध्ये दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण स्विच बंद झाले होते, असे प्राथमिक तपास अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे बोईंग ७८७ ड्रीमलाइनरच्या पायलटकडून मोठी चूक झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. मात्र, अहवालावर एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने नाराजी व्यक्त करीत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. ही चौकशी गोपनीय व पायलटवर पक्षपात करणारी आहे. यातील निष्कर्ष गडबडीत घेतले गेले असल्याचेही त्यांनी म्हटले. तर हा अहवाल कंपन्यांना वाचवत असून पायलटला दोषी ठरवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

१५ पानांच्या तपास अहवालानुसार, दोन्ही इंजिनांचे इंधन नियंत्रण कंट्रोल स्विच अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने 'रन' स्थितीतून 'कटऑफ' स्थितीत गेले, यामुळे उड्डाणाच्या काही सेकंदांतच विमानाची उंची झपाट्याने कमी झाली.

स्विच 'कटऑफ' कसे झाले, याचा स्पष्ट उल्लेख नाहीइंधन नियंत्रण स्विच 'कटऑफ' स्थितीत नेमके कसे गेले तसेच दोष कोणाचा हेही अहवालात ठोसपणे सांगितले गेलेले नाही. विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, त्यामुळे अपघातास मानवी चूकच कारणीभूत ठरल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे विमान अपघाताची सर्व चूक पायलटवर टाकल्याचे अहवालात स्पष्ट होते.

‘ते’ ३२ सेकंद१:३८:३९ PMउड्डाण भरले१:३८:४२ PMवेग ३३३ किमी प्रतितास; १ सेकंदाच्या अंतराने दोन्ही इंजिन बंद१:३८:५२ PMपायलटने इंजिन-१ सुरू करण्याचा स्विच ऑन केला, थोड्या वेळासाठी इंजिन चालू झाले१:३८:५६ PMपायलटने इंजिन-२ सुरू करण्याचा स्विच ऑन केला, परंतु इंजिन सुरू झाले नाही१:३९:०५ PMपायलटने ‘मे डे कॉल’ दिला, पण प्रतिसाद येण्यापूर्वीच विमान कोसळले१:३९:११ PMफ्लाइट रेकॉर्डरने रेकॉर्डिंग बंद केले

असा झाला दोन्ही इंजिनांमध्ये बिघाडएएआयबीच्या अहवालात म्हटले आहे की, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनांचे फ्युएल कंट्रोल स्विच रनवरून कट ऑफ या स्थितीत गेले. मात्र, हे कोणी केले किंवा कसे झाले याचा अहवालात उल्लेख नाही.इंजिनाचे आरपीएम (एन१ व एन२) कमी होऊ लागले तसतसे इंधनपुरवठा थांबवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रॅम एअर टर्बाईन (आरएटी) कार्यान्वित झाला. तो आपत्कालीन ऊर्जेचा पुरवठा करतो. त्यानंतर १० सेकंदांनी इंजिन क्रमांक १चा इंधन नियंत्रण स्वीच पुन्हा रन स्थितीत आणण्यात आला.त्यानंतर चार सेकंदांनी इंजिन क्रमांक २ची हीच स्थिती झाली. दोन्ही इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पायलटनी केला. मात्र, इंजिन क्र. १ पुन्हा कार्यान्वित झाले. इंजिन क्रमांक २ मात्र नीट सुरू झाले नाही. त्यामुळे एका पायलटने मेडे मेडे मेडे असा आपत्कालीन कॉल दिला. मात्र, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून काही उत्तर मिळण्यापूर्वीच हे विमान काही झाडांना धडकून वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. हे विमान को-पायलट उडवत होता व कॅप्टन साऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत होता. विमानाने उड्डाण केले व त्यानंतर केवळ ३० सेकंदांत ते कोसळले.

विमान वाहतूक तज्ज्ञांना काय वाटते?विमानात यांत्रिक समस्या किंवा वीज पुरवठा बंद झाल्यानंतर विमानाला इंधन पुरवठा करणाऱ्या स्विचची स्थिती बदलली असावी. जेव्हा इंधन नियंत्रण स्विच बंद करावा लागतो तेव्हा एक पायलट दुसऱ्या पायलटला सांगतो. त्यानंतरच हा स्विच बंद केला जातो. अपघातावेळी काही सॉफ्टवेअर बिघाड झाला का हे तपासणेही महत्त्वाचे असल्याचे विमान वाहतूक तज्ञांनी सांगितले.

केवळ प्राथमिक अहवाल आहे. लगेच कोणताही निष्कर्ष काढणे 'अपरिपक्व' ठरेल. ही अत्यंत तांत्रिक बाब आहे. त्यामुळे यंत्रणा याचा तपास करत आहे. अंतिम अहवाल लवकरच येईल. के. राम मोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

एएआयबीने सादर केलेला अहवाल हा प्राथमिक स्वरूपाचा असून, त्यावरून कुठलाही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. पायलटमधील संवाद खूपच मर्यादित स्वरूपाचा आहे. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया