शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

शास्त्रज्ञांचे प्रयत्न अन् लोकप्रतिनिधींच्या पाठबळातूनच कृषिक्रांती शक्य : मुख्यमंत्री

By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST

- दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक सुरूदापोली : राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि लोकप्रतिनिधींचे पाठबळ या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास राज्यामध्ये कृषिक्रांती घडून येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ४२व्या संयुक्त कृषी ...


- दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक सुरू

दापोली : राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि लोकप्रतिनिधींचे पाठबळ या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास राज्यामध्ये कृषिक्रांती घडून येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ४२व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, दुर्दैवाने महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशासारख्या नैसर्गिक आपत्तींना शेतकरी व शासनाला तोंड द्यावे लागले आणि प्रत्येक वेळी शासनाने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला़ याचाच परिणाम सरकारच्या तिजोरीवर झाल्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांना विविध सुविधा निर्मितीसाठी द्यावयाचे अतिरिक्त अनुदान वितरित करणे शासनाला शक्य झाले नाही.
कोकणामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना देखील प्रचलित अटी-शर्तींना अधीन राहून मदतीचा हात दिला जाईल, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. राज्यातील सामान्य माणसाची क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत असून, त्यासाठी कृषी उत्पादनाचा आलेखही सतत उंचावत ठेवणे गरजेचे आहे. विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ आणि उत्पादक शेतकरी यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात, असेही ते म्हणाले़
यावेळी विद्यापीठाचे प्रतिकुलपती आणि राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, राज्यातील चारही विद्यापीठांचे कुलगुरू, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, वानखेडे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक मारुती सावंत, विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, आनंद कोठडीया, बकवाड, हुस्नबानू खलिफे, चारही विद्यापीठांचे संशोधन संचालक आणि दापोलीच्या नगराध्यक्षा विनीता शिगवण उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विखे-पाटील म्हणाले की, हवामान अंदाज, पीक विमा योजना, पीकसंरक्षण यांसारख्या विषयांवर आधारित शिफारशीदेखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात याव्यात. तसेच जैवतंत्रज्ञानासारख्या शास्त्राचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्यात यावी. उदय सामंत आणि सुनील तटकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि बैठकीस शुभेच्छा दिल्या. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी प्रास्ताविक केले.
संशोधनपर उत्कृष्ठ लेखाचा पुरस्कार यावेळी डॉ. दत्तात्रय लाड यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच चारही विद्यापीठांनी निर्माण केलेल्या विविध प्रकाशनांचे विमोचनही पार पडले. राज्यातील गारपीटग्रस्तांना मदतीचा हात म्हणून विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी देऊ केलेल्या एक दिवसाच्या वेतनाच्या रकमेचा धनादेश यावेळी कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. बैठकीच्या उद्घाटन समारंभापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या वॉटरशेड पार्क, इंडो ईस्रायल प्रकल्प, आदी विभागांना भेटी दिल्या. तसेच बैठकीच्या ठिकाणी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनासही भेट दिली.
संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी आभार मानले. जैवतंत्रज्ञान कक्षाचे प्रभारी अधिकारी डॉ. एन. बी. गोखले यांनी सूत्रसंचालन केले़. या बैठकीला राज्यातून सुमारे २० शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी उपस्थित असून, तीन दिवस चालणार्‍या तांत्रिक सत्रामध्ये एकूण ११ गटांमध्ये संशोधन विषयक चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)

फोटो आहे.
फाईल
१२०५२०१४-आरटीएन-०१
कॅप्शन
दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.