शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव

अखेर २५ वर्षांनंतर मोबदल्याचा प्रस्ताव
संघर्ष न्यायासाठी : मनपाचा असा हा निर्दयीपणा
औरंगाबाद : मनपा प्रशासन पुष्पनगरी भूखंड ताब्यात घेण्यासाठी डोळे झाकून सव्वाकोटी रुपयांचा मोबदला देते. मात्र, एखाद्या गरिबाच्या जागेवर २५ वर्षांपासून सुलभ शौचालय बांधून जागामालकाला एक रुपयाही मोबदल्यादाखल देत नाही. जागामालक १९९१ पासून प्रशासनाकडे हेलपाटे मारून थकल्यानंतर २० फेबु्रवारीच्या सभेत मोबदला देण्याचा प्रस्ताव सहायक संचालक नगररचना यांनी सभेसमोर आणला आहे. सर्वसामान्यांना मनपाकडून न्याय मिळण्यासाठी २५ वर्षे लागतात. हे या प्रकरणातून पुढे आले आहे.
मनपाच्या नगर भूमापन क्र. ११३९१ पैकी मोहल्ला फाजलपुरा येथे खाजगी मालमत्तेवर सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. पी.आर. कार्डवर संजय टोणपे यांचे नाव आहे. सार्वजनिक वापरासाठी तेथे २२ वर्षांपासून शौचालय आहे. मनपाने त्या जागेसाठी टोणपे यांना काहीही मोबदला दिलेला नाही. असे नगररचना विभागाने प्रस्तावात म्हटले आहे. २०१५ या वर्षीच्या आर.आर. रेटनुसार टोणपे यांना मोबदला द्यावा लागणार आहे, असे नगररचना विभागाने प्रस्तावात म्हटले आहे.

१९९१ पासून पाठपुरावा
संजय टोणपे हे मनपाकडून मोबदला मिळावा यासाठी १९९१ पासून पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. आजवर मनपाने त्यांची जागा फुकटात वापरली. माजी महापौर अनिता घोडेले यांच्या कार्यकाळात त्यांना मोबदला देण्याप्रकरणी संचिका तयार झाली. त्यानंतर महापौर कला ओझा यांच्या काळात त्यांना मोबदला मिळतो आहे. एखाद्या प्रकरणात जर अर्थकारण दडलेले असेल आणि त्यातून सर्वांचा फायदा होणार असेल तर तसे प्रस्ताव पारित करून त्याचा ठराव होतो; परंतु एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला मोबदला मिळण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागतो. यातून मनपाची मानसिकता कशी आहे, हे लक्षात येते.