शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त न्याहारीही द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:08 IST

या धोरणात नमूद केले आहे की, ज्या शाळांमध्ये रोज मध्यान्ह भोजन बनविणे शक्य नसेल तिथे त्याऐवजी चणे, शेंगदाणे, गूळ व एखादे फळ असा आहार त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा.

नवी दिल्ली : सरकारी किंवा अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेली न्याहारीही द्यावी, असे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटले आहे. या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या धोरणात म्हटले आहे की, विशिष्ट विषयांच्या अभ्यासासाठी आणखी ऊर्जा मिळण्याकरिता पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेली सकाळची न्याहारी ही विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरते, असे संशोधनातून आढळून आले आहे. त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार करून त्यात न्याहारीचाही समावेश करण्यात यावा. कुपोषित किंवा अशक्त असलेली मुले व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण दिले जाईल, तसेच त्यांना प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते व समुपदेशक मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची नीट काळजी घेतली जाईल.

या धोरणात नमूद केले आहे की, ज्या शाळांमध्ये रोज मध्यान्ह भोजन बनविणे शक्य नसेल तिथे त्याऐवजी चणे, शेंगदाणे, गूळ व एखादे फळ असा आहार त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नेहमी वैद्यकीय तपासणी करावी. शाळेतील सर्व मुले निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. मूल ५ वर्षांचे होईपर्यंत बालवाटिका किंवा बालवाडीमध्ये जाईल. बालवाडीतील मुलांना हसत-खेळत शिक्षण दिले जाईल. खेळाच्या माध्यमातून त्यांना शिकविले जाईल. अशा विद्यार्थ्यांनाही पौष्टिक न्याहारी व मध्यान्ह भोजन अशा दोन्ही गोष्टी द्याव्यात. अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या मुलांची जशी नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते, तशीच सोय बालवाड्यांमधील तसेच प्राथमिक शिक्षण घेणाºया मुलांसाठीही करण्यात यावी.सरकारी तसेच अनुदानित शाळा, विशेष प्रशिक्षण केंद्रे, समग्र शिक्षण योजनेच्या कक्षेत येणाºया मदरसा यांच्यातील इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना सरकारतर्फे राबविली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया तसेच सरकारी, अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाºया तसेच सहा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेच्या सुटीचे दिवस सोडून रोज एक वेळचे जेवण मोफत मिळाले पाहिजे, अशी तरतूद राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्याप्रमाणे केंद्र सरकारने व्यवस्था केली असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले. त्याशिवाय काही राज्ये व केंद्रशासित प्रदेश मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त स्वत:च्या खर्चाने विद्यार्थ्यांना दूध, अंडी, फळे देत असतात.मध्यान्ह भोजन योजनेचे साडेअकरा कोटी विद्यार्थी लाभार्थीच्मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देशातील ११.५९ कोटी विद्यार्थी घेत आहेत. या योजनेमुळे स्वयंपाक व अन्य कामांसाठी २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.च्कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून त्या पुन्हा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी विशिष्ट रक्कम भत्ता म्हणून द्यावी, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यांना सुचविले आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारस

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण