शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त न्याहारीही द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:08 IST

या धोरणात नमूद केले आहे की, ज्या शाळांमध्ये रोज मध्यान्ह भोजन बनविणे शक्य नसेल तिथे त्याऐवजी चणे, शेंगदाणे, गूळ व एखादे फळ असा आहार त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा.

नवी दिल्ली : सरकारी किंवा अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेली न्याहारीही द्यावी, असे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटले आहे. या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या धोरणात म्हटले आहे की, विशिष्ट विषयांच्या अभ्यासासाठी आणखी ऊर्जा मिळण्याकरिता पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेली सकाळची न्याहारी ही विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरते, असे संशोधनातून आढळून आले आहे. त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार करून त्यात न्याहारीचाही समावेश करण्यात यावा. कुपोषित किंवा अशक्त असलेली मुले व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे शालेय शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण दिले जाईल, तसेच त्यांना प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते व समुपदेशक मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची नीट काळजी घेतली जाईल.

या धोरणात नमूद केले आहे की, ज्या शाळांमध्ये रोज मध्यान्ह भोजन बनविणे शक्य नसेल तिथे त्याऐवजी चणे, शेंगदाणे, गूळ व एखादे फळ असा आहार त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नेहमी वैद्यकीय तपासणी करावी. शाळेतील सर्व मुले निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. मूल ५ वर्षांचे होईपर्यंत बालवाटिका किंवा बालवाडीमध्ये जाईल. बालवाडीतील मुलांना हसत-खेळत शिक्षण दिले जाईल. खेळाच्या माध्यमातून त्यांना शिकविले जाईल. अशा विद्यार्थ्यांनाही पौष्टिक न्याहारी व मध्यान्ह भोजन अशा दोन्ही गोष्टी द्याव्यात. अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या मुलांची जशी नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते, तशीच सोय बालवाड्यांमधील तसेच प्राथमिक शिक्षण घेणाºया मुलांसाठीही करण्यात यावी.सरकारी तसेच अनुदानित शाळा, विशेष प्रशिक्षण केंद्रे, समग्र शिक्षण योजनेच्या कक्षेत येणाºया मदरसा यांच्यातील इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना सरकारतर्फे राबविली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया तसेच सरकारी, अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणाºया तसेच सहा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेच्या सुटीचे दिवस सोडून रोज एक वेळचे जेवण मोफत मिळाले पाहिजे, अशी तरतूद राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये करण्यात आली आहे. त्याप्रमाणे केंद्र सरकारने व्यवस्था केली असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले. त्याशिवाय काही राज्ये व केंद्रशासित प्रदेश मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त स्वत:च्या खर्चाने विद्यार्थ्यांना दूध, अंडी, फळे देत असतात.मध्यान्ह भोजन योजनेचे साडेअकरा कोटी विद्यार्थी लाभार्थीच्मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देशातील ११.५९ कोटी विद्यार्थी घेत आहेत. या योजनेमुळे स्वयंपाक व अन्य कामांसाठी २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.च्कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून त्या पुन्हा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी विशिष्ट रक्कम भत्ता म्हणून द्यावी, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यांना सुचविले आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारस

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण