शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

तीर्थयात्रेवरून परतताना ९ जणांवर काळाचा घाला; धावत्या बसला लागली आग; १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 1:38 PM

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले.

गुरुग्राम : हरयाणातील नूह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका धावत्या बसला आग लागून त्यातील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला व १५ जण जखमी झाले. त्यातील प्रवासी मथुरा, वृदांवन येथे तीर्थयात्रा करून आपल्या गावी परत जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. त्यातील प्रवासी पंजाबमधील होशियारपूर, लुधियाना येथील रहिवासी आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले. जखमी पंधरा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसला कशामुळे आग लागली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बसला आग लागल्याचे लक्षात येताच काही स्थानिक नागरिकांनी या बसचा पाठलाग केला. त्यानंतर चालकाला सावध करून बस थांबवायला सांगितली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस तसेच अग्निशमन दलाला हा प्रकार कळविला. हरयाणातील नूह जिल्ह्यातील भीषण बस दुर्घटनेचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

उपचार सुरू असलेल्या जखमींची प्रकृती स्थिरनूह जिल्ह्यामध्ये बसला आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींवर शासकीय रुग्णांलयात उपचार सुरू असल्याची त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीदेखील सदर अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

टॅग्स :fireआगpassengerप्रवासीDeathमृत्यू