शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 11:58 IST

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं.

ठळक मुद्देबँकांचं कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांवर मोदी सरकार काय, कशी आणि कधी कारवाई करणार, याची चर्चा सुरू आहे.मोदी सरकार - 1 दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांमधील 'विलफुल डिफॉल्टर्स'ची संख्या 60 टक्क्यांनी वाढली. या दिवाळखोरांकडून 7,600 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 'नमो 2.0' ची सुरुवात झाली आहे. संसदेचं अधिवेशनही सुरू झालं असून 5 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामनदेशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यांच्या पोतडीतून काय निघणार, याबद्दल उत्सुकता आहेच; पण बँकांचं कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्यांवर मोदी सरकार काय, कशी आणि कधी कारवाई करणार, याची चर्चाही सुरू आहे. या दरम्यानच, मोदी सरकार-1च्या कार्यकाळात 'विलफुल डिफॉल्टर'ना दिलेल्या दणक्याबाबत सीतारामन यांनी माहिती दिली आहे.

कर्ज फेडण्याची क्षमता असूनही कर्जचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती-कंपन्यांना 'विलफुल डिफॉल्टर' ठरवलं जातं. म्हणजेच, प्रामुख्याने सूट-बूटवाले बडे उद्योगपती या गटात येतात. मोदी सरकार हे 'सूट-बूट की सरकार' असून उद्योगपतींसाठीच काम करत असल्याची टीका विरोधक करत होते - अजूनही करतात. परंतु, मोदी सरकार - 1 दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांमधील 'विलफुल डिफॉल्टर्स'ची संख्या 60 टक्क्यांनी वाढली. म्हणजेच, या कार्यकाळात कर्जबुडव्यांना अभय न देता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, 'डिफॉल्टर' म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. वित्त वर्ष 2014-15 मध्ये देशात 5,349 'विलफुल डिफॉल्टर्स' होते. ही संख्या 2018-19 च्या अखेरीस 8,582 इतकी झाली होती. या दिवाळखोरांकडून 7,600 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं आहे. 

31 मार्च 2019 पर्यंत बँकांनी 8,121 प्रकरणांमध्ये कर्जवसुलीसाठी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार 2,915 प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

दे धक्का!

विलफुल डिफॉल्टरला बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कुठलंही कर्ज दिलं जात नाही. पुढची पाच वर्षं या व्यक्ती किंवा कंपन्या कुठलाही नवा उद्योग सुरू करू शकत नाहीत. तसंच, सेबीच्या नियमांनुसार दिवाळखोर व्यक्ती आणि कंपन्यांसाठी कॅपिटल मार्केटची दारंही बंद केली जातात. 

दरम्यान, मोदी सरकारच्या रणनीतीमुळे सरकारी बँकांच्या एनडीएमध्ये (नॉन परफॉर्मिंग एसेट्स) घट झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी नमूद केलं. तसंच, काळ्या पैशाच्या 380 प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यात आली असून त्यात 12,260  कोटी रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनlok sabhaलोकसभाblack moneyब्लॅक मनी