शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Karnataka Elections 2018 : जाणून घ्या भाजपाच्या विजयाची पाच कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 13:28 IST

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रचार केला होता.

बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होतो आहे. निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पहायला मिळतं आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची पिढेहाट झाली आहे. कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रचार केला होता. त्याचाच परिणाम निवडणूक निकालावर दिसत असल्याचं जाणकार सांगतात. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली गेली होती पण सर्व एक्झिट पोल फोल ठरले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही स्पष्ट बहुमताचा दावा केला होता. 

जाणून घेऊया भाजपाच्या विजयाची पाच कारणं

- नरेंद्र मोदींची जादूभाजपाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा लोकप्रिय चेहरा आहे. मोदींवर लोक विश्वास दाखवतात. जवळपास सगळ्याच विधानसङा निवडणुकीत भाजपासाठी मोदींचा चेहरा ट्रम्प कार्ड सिद्ध झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहार आणि दिल्लीची निवडणुक वगळता. नरेंद्र मोदींनी इतर सगळ्या निवडणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता पण मोदींच्या प्रचाराने तेथिल चित्र काही प्रमाणात बदललं. कर्नाटकात काँग्रेस व भाजपात अटीतटीची लढत पाहायला मिळेल असं बोललं जात होतं. पण मोदींच्या प्रचाराचा परिणाम निकालावर पाहायला मिळाला. 

- भाजपा आणि अमित शहांची रणनितीभाजपाकडे कार्यकर्त्यांचं चांगलं मंडळ आहे. काँग्रेसच्या तुलनेत हे मंडळ अधिक मजबूत आहे. भाजपाची पकड कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत आहे. अमित शहा आपली रणनिती बूथ लेवलपासून करतात. त्यामुळे ही रणनिती निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावते.  

- सिद्धरामय्या फॅक्टरकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात सत्ताविरोधी लाटेचा सामना करत होते. 1985पासून कर्नाटकाच्या जनतेने कुठल्याही राजकीय पक्षावर दोन वेळा विश्वास दाखवला नाही. रामकृष्ठ हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दलाने सलग दोन वेळा सरकार स्थापन केलं. दुसरीकडे, सिद्धरामय्या सरकारवर विभाजन करणाऱ्या राजकीय रणनिती असल्याचे आरोप लावले गेले. तसंच जातीच्या राजकारणाचेही सिद्धरामय्या यांच्यावर आरोप लावले गेले. भाजपाने हाच मुद्दा पकडून सिद्धरामय्या यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. तसंच भाजपाने सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचारचे जोरदार आरोप केले. 

- लिंगायत कार्डाचा भाजपाला फायदाकर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने लिंगायत हा वेगळा धर्म घोषित करून मोठी खेळी केली. त्यांनी लिंगायत समाजाच्या लोकांचा वेगळा झेंडा व कर्नाटकसाठी वेगळ्या राष्ट्रगीताची घोषणा केली. यामुळे बराच वाद झाला. टिपू सुल्तानची जयंती साजरी करण्यावरून वाद झाला. लिंगायत समाजाचं संपूर्ण व्होट बँक आपल्याला मिळेल, असा सिद्धरामय्या यांचा समज होता. पण यामुळे दुसऱ्या समाजातील लोक नाराज झाले. अशातच काँग्रेसच्या लिंगायत कार्डाचा फायदा भाजपाला झाला. 

 - येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांची वापसीलिंगायत समाजाचे मोठे नेते बीएस येडियुरप्पा आणि बी श्रीरामुलू यांच्या परतण्याचा भाजपाला मोठा फायदा झाला. यामुळे काँग्रेस विरोधी मतामध्ये एकजूट झाली आणि कर्नाटकमध्ये भाजपाच्या विजयाचा रस्ता मोकळा झाला. 2012 मध्ये येडियुरप्पा आणि श्रीरामलू भाजपातून बाहेर पडले होते. 2013मध्ये त्यांनी वेगळ्या निवडणुका लढल्या. त्या निवडणुकीत भाजपाचं मोठं नुकसान झालं. 2014मध्ये दोन्ही नेते भाजपामध्ये परतले.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा