शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जनता एक्स्प्रेस घसरून ३८ प्रवासी ठार

By admin | Updated: March 20, 2015 23:58 IST

वाराणसी जिल्ह्यातील बछरावा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून- वाराणसी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने किमान ३८ प्रवासी ठार, तर सुमारे १५० जण जखमी झाले.

रायबरेली : वाराणसी जिल्ह्यातील बछरावा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून- वाराणसी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने किमान ३८ प्रवासी ठार, तर सुमारे १५० जण जखमी झाले.सकाळी ९.३० वाजता बछरावा स्थानकाजवळ चालकाने सिग्नल ओलांडल्याची परिणती इंजिन आणि लगतचे दोन डबे रुळावरून घसरण्यात झाल्याचे रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी दिल्लीत सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता, की एका डब्याचा केवळ पोलादी सांगाडा तेवढा उरला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल व वाहतूक सदस्य अजय शुक्ला यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचा आदेश दिला. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लखनौचे विभागीय आयुक्त महेश गुप्ता यांनी वर्तवली. लखनौपासून सुमारे ५० कि. मी. अंतरावर हा अपघात झाला. गावकऱ्यांचा मदतीचा हात अपघाताचे वृत्त कळताच बछरावा गावाजवळील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला. अनेक प्रवासी तुटलेल्या डब्यांमध्ये अडकून होते. अनेक प्रवासी वेदनेने विव्हळत आणि मदतीसाठी ओरडत असताना अ‍ॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांच्या चमूने घटनास्थळी धाव घेत प्रथमोपचार केले. डब्याच्या आतील भाग पार चेपून गेल्यामुळे गॅस कटरच्या साह्याने भाग तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. (वृत्तसंस्था)उत्तर प्रदेश विधानसभेत मुद्दाया रेल्वे अपघातानंतर राज्य सरकारने तडकाफडकी मदत पोहोचवली नसल्याचा आरोप बसपाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी हा मुद्दा उपस्थित केला. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हजर नसल्याची माहिती मिळताच मी गृहमंत्रालयाच्या प्रधान सचिवांना फोन करून त्यामागचे कारण विचारले असता हे दोन्ही अधिकारी सुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यातून सरकार किती गंभीर आहे, हेच दिसून येते असे मौर्य म्हणाले.रेल्वे अपघाताबद्दल राष्ट्रपतींना दु:खराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी रायबरेली जिल्ह्यात रेल्वे रुळावरून घसरल्याचे वृत्त कळले. मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्यासह जखमींना वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत मी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना कळविले आहे, असे ते राज्यपाल राम नाईक यांना पाठविलेल्या संदेशात म्हणाले. जखमींच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.मदतीची घोषणा तपासाचे आदेश देतानाच रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर व किरकोळ जखमींना अनुक्रमे प्रत्येकी ५० आणि २० हजार रुपयांची मदत तडकाफडकी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करीत मृतांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. जखमींना रायबरेलीच्या जिल्हा रुग्णालयात तर गंभीर जखमींना लखनौच्या किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात दाखल करण्यात आले. ४काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतानाच त्यांनी सरकारकडून पुरेशा मदतीची, तसेच जखमींना योेग्य प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळण्याची आशा व्यक्त केली. त्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातात ३४६ जणांचा मृत्यूनवी दिल्ली : मागील तीन वर्षांत चौकीदार नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर एकूण १४५ अपघात घडले आणि त्यात ३४६ जणांचा मृत्यू झाला. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. यंदा व मागील दोन वर्षांत अशा चौकीदार नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या अपघातांचा तपशील काय? त्यात नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला?असा प्रश्न खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत विचारला होता.