शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गोस्वामी यांना ३ आठवड्यांचा दिलासा; सुरक्षा देण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 16:36 IST

सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले की, इतके वकील नवीन खटल्यासाठी का आले आहेत.

ठळक मुद्देवकील  मुकुल रोहतगी अर्णबसाठी हजर झाले होते. महाराष्ट्रासाठी कपिल सिब्बल, छत्तीसगडसाठी विवेक तंखा, राजस्थानसाठी मनीष सिंघवी यांच्यासह एकूण 8 वकिलांनी सुनावणीसाठी  होती . सर्व एफआयआर एकत्र जोडा. नंतर पुढील सुनावणी पार पडेल. एकाच प्रकरणाची चौकशी बर्‍याच ठिकाणी होऊ शकत नाही.

नवी दिल्ली -  न्या. डॉ डी वाय चंद्रचूड आणि न्या. एम आर शाह यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आहे. या याचिकेद्वारे त्याच्याविरोधात देशातील विविध भागात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला आव्हान देण्यात आले होते. वकील  मुकुल रोहतगी अर्णबसाठी हजर झाले होते. महाराष्ट्रासाठी कपिल सिब्बल, छत्तीसगडसाठी विवेक तंखा, राजस्थानसाठी मनीष सिंघवी यांच्यासह एकूण 8 वकिलांनी सुनावणीसाठी  होती. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी विचारले की, इतके वकील नवीन खटल्यासाठी का आले आहेत.अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांना 3 आठवड्यांचा अवधी देण्यात आला होता. म्हणजे तोपर्यंत अटक थांबविण्यात येईल. रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाला सुरक्षा पुरवण्यासही कोर्टाने मुंबई पोलीस आयुक्तांना सांगितले आहे. अर्णब यांचे  यांचे वकील म्हणाले, नागपुरात नोंदलेली एफआयआर मुंबईत वर्ग करावा. अर्णबवरील हल्ल्याचीही एकाच वेळी चौकशी झाली पाहिजे. आमच्या कार्यालयाचेही संरक्षण झाले पाहिजे. कोर्टाने सांगितले की, आम्ही सध्या एफआयआर दाखल झालेल्या कोणत्याही कारवाईवर बंदी घातली आहे. तोपर्यंत याचिकाकर्त्यांनी त्यांच्या अर्जात सुधारणा करावीत. सर्व एफआयआर एकत्र जोडा. नंतर पुढील सुनावणी पार पडेल. एकाच प्रकरणाची चौकशी बर्‍याच ठिकाणी होऊ शकत नाही.छत्तीसगड सरकारचे वकील विवेक तंखा यांनी अर्णब गोस्वामी यांना अशी विधाने करण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यावर न्या. चंद्रचूड म्हणाले की, माध्यमांवर कोणताही अंकुश ठेवू नये. माध्यमांवर कोणत्याही प्रकारच्या बंदीला माझा विरोध आहे. त्यावर सिब्बल म्हणाले की, एफआयआर नोंदविला गेला आहे. अशा एफआयआर रद्द करता येणार नाहीत. पोलिसांना काम करू द्या. त्यावर अर्णब यांचे वकील रोहतगी यांनी त्यांच्यावरील हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. यावर कपिल सिब्बल यांनी अर्णब यांचे वक्तव्य वाचून म्हटले की, जातीयवादी हिंसाचार पसरवण्याची चर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येऊ शकत नाही. अर्णब गोस्वामी यांचे वकील रोहतगी यांनी न्यायाधीशांना पालघर घटनेविषयी सांगितले. त्यावर अर्णबने त्यावर 45 मिनिटांचा कार्यक्रम केला, परंतु त्या बदल्यात अनेक राज्यात एफआयआर दाखल करण्यात आला. वकील रोहतगी म्हणाले की, सर्वत्र दाखल झालेल्या एफआयआरची भाषा सारखीच आहे. हे स्पष्ट आहे की, अर्णब यांना पद्धतशीरपणे जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामीNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसMumbaiमुंबई