शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:16 IST

Telangana News: तेलंगाणामधील करीमनगर जिल्ह्यातील गांद्रपल्ली गावातील रहिवासी सध्या प्रचंड भीतीच्या छायेत आहेत. अवघ्या ९० दिवसांमध्ये गावातील सुमारे २८ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतिषी आणि पुजाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर गावकऱ्यांनी गाव सोडून जवळच्या जंगलात आश्रय घेतला आहे.

तेलंगाणामधील करीमनगर जिल्ह्यातील गांद्रपल्ली गावातील रहिवासी सध्या प्रचंड भीतीच्या छायेत आहेत. अवघ्या ९० दिवसांमध्ये गावातील सुमारे २८ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतिषी आणि पुजाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर गावकऱ्यांनी गाव सोडून जवळच्या जंगलात आश्रय घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांची वर्दळ, सणावारांचा उत्साह यांनी गजबजलेल्या गावा सध्या शुकशुकाट पसरला आहे. सर्वत्र भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण दिसून येत आहे.

गांद्रपल्ली गावामध्ये गेल्या ९० दिवसांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वृद्धांसह काही तरुणांचाही समावेश आहे. या मृत्यूंमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावात एकापाठोपाठ एक होत असलेल्या मृत्यूंचं कारण ग्रामस्थांना कळत नाही आहे. त्यामुळे अस्वस्थता अधिकच वाढली आहे. सलग तीन महिन्यांपासून गावात सुरू असलेल्या या एकापाठोपाठ एक मृत्यूच्या घटनांमुळे गावावर कुठल्या तरी वाईट शक्तीचं सावट आल्याचं गावकऱ्यांना वाटत आहे. तसेच त्यावर उपाय शोधण्यासाठी गावकऱ्यांनी पुजाऱ्यांचा आश्रय घेतला आहे.

भीतीच्या सावटाखाली असलेल्या गावकऱ्यांनी जेव्हा ज्येष्ठ नागरिक आणि ज्योतिषांची मदत घेतली तेव्हा त्यांना गाव रिकामी करण्याचा सल्ला देण्यात आला. पुजाऱ्याने गावाची कुंडली पाहून केवळ अनुष्ठान आणि जंगलात स्थलांतर केल्यानेच संकट टळेल, असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी सकाळी सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या घरांना कुलूप ठोकून गुराढोरांना, लहान मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर तिथे पारंपरिक भोजन बनवून देवांची पूजा करण्यात आली.

गावकऱ्यांनी पलायन केल्याने गाव ओसाड पडला आहे. तर तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी मृत्यूंमागचं खरं कारण शोधलं पाहिजे. हे कारणं पाणी, संसर्ग किंवा भौगोलिक स्थिती हे असू शकतं. सामाजिक कार्यकर्तेही कुठल्यातरी गंभीर आरोग्याच्या समस्येमुळे हे मृत्यू होत असल्याची शंका उपस्थित करत आहेत. २८ मृत्यू हा मोठा आकडा आहे. त्यामुळे गावात वैद्यकीय शिबीर आयोजित करूनन गावकऱ्यांना दूषित पाणी, संसर्ग आणि भौगोलिक कारणांपासून बचावाबाबत जागरूक केलं पाहिजे असं मत ते मांडत आहेत. दुसरीकडे गांद्रपल्ली गावातील रहिवासी आपला गाव पुन्हा एकदा कधी सुरक्षित होईल, याची वाट पाहत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 28 Deaths in 90 Days: Village Vacated After Priest's Advice

Web Summary : Fear gripped Gandrapalli after 28 deaths in 90 days. Priests advised vacating the village. Villagers fled to the forest seeking refuge, leaving the village deserted. Experts urge investigation into the deaths.
टॅग्स :TelanganaतेलंगणाIndiaभारतJara hatkeजरा हटके