शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
3
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात होणार दाखल
4
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
5
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
6
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
7
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
8
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
9
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
10
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
11
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
12
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
13
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
14
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
15
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
16
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
17
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
18
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
19
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
20
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा परिणाम : लोकांच्या हातात २६ लाख कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 01:22 IST

कोरोनाचा परिणाम : सार्वकालिक उच्चांक; हातातील रोकड साठा संपला

मुंबई/नवी दिल्ली : भारतातील चलनात म्हणजेच लोकांच्या हातात असलेल्या नोटा पहिल्यांदाच विक्रमी २६ लाख कोटी रुपयांवर गेल्या आहेत. कोविड-१९च्या काळात लोकांनी आपल्याकडील रोख रकमेचा साठा वाढविल्यामुळे चलनातील नोटा वाढल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या डाटानुसार, चलनातील नोटांचे प्रमाण नव्या उच्चांकावर गेले असले तरी मागील दोन महिन्यांपासून वाढीची गती मंदावली आहे. ११ सप्टेंबरला संपलेल्या पंधरवड्यात लोकांच्या हातातील चलन १७,८९१ कोटी रुपयांनी वाढून २६ लाख कोटी रुपयांवर गेले. २८ फेब्रुवारी २०२० रोजी चलनात २२.५५ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. तेव्हापासून लोकांच्या हातातील चलनात ३.४५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नोटांबदीच्या आधी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात १७.९७ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. नोटाबंदीनंतर अल्पकाळासाठी चलनातील नोटांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले होते. उदा. जानेवारी २०१७ मध्ये चलनातील नोटा घसरून ७.८ लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. तथापि, ही स्थिती फार काळ टिकून राहू शकली नाही. चलनातील नोटा त्यानंतर झपाट्याने वाढत गेल्या. आता त्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी साठविलेल्या पैशांवर त्यांना गुजराण करावी लागली.

२०१६ मध्ये सरकारने नोटांबदी जाहीर केली तेव्हा ‘देशाची अर्थव्यवस्था रोखविरहित करण्यासाठी’ हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात होते. तथापि, सरकारचा हा उद्देश तर साध्य झाला नाहीच, उलट नोटाबंदीनंतर आतापर्यंत चलनी नोटांत ४५ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMONEYपैसा