शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

देशात दरवर्षी कॅन्सरचे १५ लाख नवे रुग्ण, दरवर्षी ८ लाख लोकांचा होत आहे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:28 IST

२०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशात कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी वेगाने वाढत आहेत. दरवर्षी १५ लाख लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडत आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८ लाख प्रतिवर्ष झाली आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहेत.आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले की, २०१६ ते २०१८ या काळात २३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक ८ लाख १ हजार ३७४ कॅन्सरपीडितांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला आहे. चौबे यांनी लोकसभेत सांगितले की, केवळ २०१८ मध्ये कॅन्सरपीडितांची संख्या ४३ लाख ६३ हजार आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कॅन्सरचे १५ लाख ८६ हजार ५७१ रुग्ण नोंद झाले आहेत.

याशिवाय वर्ष २०१७ मध्ये १५ लाख १७ हजार आणि वर्ष २०१६ मध्ये १४ लाख ५१ हजार रुग्ण समोर आले आहेत. सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात आढळून आले आहेत. त्यानंतर कॅन्सरपीडितांची सर्वाधिक संख्या बिहार आणि महाराष्ट्रात आहे. कॅन्सरवरील उपाययोजनांबाबत चौबे यांनी सांगितले की, राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम १९७५ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर याला राष्ट्रीय कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग नियंत्रण कार्यक्रम बनविण्यात आले. याअंतर्गत लवकरात लवकर निदान, उपचार यासाठी देशात जिल्हा स्तरावर ६१६ क्लिनिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ३,८२७ क्लिनिक स्थापन करण्यात आले. याशिवाय केमोथेरपीसाठी २१४ डे केअर केंद्रे बनविण्यात आली आहेत.रोगावर मात करण्यासाठी उपाययोजनाकॅन्सरच्या तिस-या स्टेजच्या देखभालीसाठी एक योजना सुरू करण्यात आली आहे. यानुसार १९ राज्य कॅन्सर संस्था आणि २० कॅन्सर केंद्रांची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.याशिवाय पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत एम्स आणि दुसºया संस्थांमध्येही शास्त्रीय अभ्यासावर लक्ष दिले जात आहे. हरयाणात राष्ट्रीय कॅन्सर संस्था आणि कोलकात्यात चितरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचा विकास करण्यात येत आहे.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारतHealthआरोग्य