शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ग्रामीण भागातील महिलांची सरपणासाठी जंगलात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 17:31 IST

देवगांव : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कुटुंबांना गॅस जुळणी मिळाली. खेड्यातील जनता या योजनेमुळे आनंदित असतानाच गॅसच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे गोरगरीब जनतेच्या आनंदावर विरजण पडले. गृहिणीचे अर्थकारण बिघडले. संपलेला सिलेंडर पुन्हा भरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय या योजनेचा लाभ घेतल्याने रॉकेलही मिळत नसल्याने गृहणींच्या हालात भर पडली असून नाईलाजाने ग्रामीण भागातील महिला चुलीसाठी गोवऱ्या व सुकलेल्या सरपणासाठी जंगलाकडे वळू लागल्या आहेत.

ठळक मुद्देगॅस दरवाढ : अनुदानित रॉकेलही बंद

देवगांव : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कुटुंबांना गॅस जुळणी मिळाली. खेड्यातील जनता या योजनेमुळे आनंदित असतानाच गॅसच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे गोरगरीब जनतेच्या आनंदावर विरजण पडले. गृहिणीचे अर्थकारण बिघडले. संपलेला सिलेंडर पुन्हा भरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय या योजनेचा लाभ घेतल्याने रॉकेलही मिळत नसल्याने गृहणींच्या हालात भर पडली असून नाईलाजाने ग्रामीण भागातील महिला चुलीसाठी गोवऱ्या व सुकलेल्या सरपणासाठी जंगलाकडे वळू लागल्या आहेत.ग्रामीण भागात उज्ज्वल योजनेमुळे घराघरांत गॅस सिलेंडर आला. त्यामुळे या योजनेचे मोठे कौतुक देखील झाले. चुलीच्या संपर्कात महिला येऊन डोळ्यांना त्रास होऊ नये, महिलांना धुरापासून मुक्ती व्हावी यासाठीग्रामीण भागात उज्ज्वल योजनेमुळे घराघरांत गॅस सिलेंडर आला. त्यामुळे या योजनेचे मोठे कौतुक देखील झाले. उज्ज्वला योजनेतून गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर आणि शेगडी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सिलेंडर भरण्यासाठी पैसेच नसल्याने सिलेंडर रिफिल करता येत नाही. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅसही रिफिल करता येत नाही आणि शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेलही मिळत नसल्याने महिलांना सुके लाकूड व गवऱ्यासाठी जंगलात वणवण फिरावे लागत आहे.ताळेबंदीच्या काळात रेशन दुकानातून उपलब्ध करून दिलेल्या धान्यांमूळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. स्वस्त धान्य दुकानातून धान्यांसह रॉकेलही मिळत होते. परंतु, गॅसचा लाभ घेतल्यामुळे दुकानातून मिळणारे रॉकेल बंद झाले. आणि सिलेंडरच्या वाढत्या किंमती ग्रामीण भागातील गरीब लोकांना परवडत नसल्याने चूल पेटविण्यासाठी सरपणाच्या शोधात महिलांना जंगलाकडे धाव घ्यावी लागत आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहोचले मात्र वाढत्या दरामुळे व आर्थिक परिस्थितीमुळे सिलेंडर घेणे कठीण झाले आहे. त्यातच शासनाने केरोसीनवर बंदी आणल्याने खेड्यातील महिला गोवऱ्या व सरपणाकडे वळल्या आहेत.१०० रुपयात उज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला परंतु सिलेंडरच्या किंमतीतील दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने चुलच बरी अशी भावना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांमध्ये झाली आहे. रेशन कार्डवर मिळणारे केरोसीनसुद्धा बंद झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक बजेट बिघडले असून पुन्हा गोवऱ्या व सरपणावर चुली पेटत असल्याचे वास्तव आहे.अनुदानित सिलिंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्‍याबाहेर गेल्याने आपली चूल बरी, अशी भावना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांमधील गृहिणींमध्ये तयार झाली. आरक्षित जंगलातून चुलीसाठी सरपण मिळणे अवघड असले, तरी जंगलतील रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या लाकूडफाटा विनापैशांच्या असल्याने ग्रामीण कष्टकरी महिला जमा करतांना दिसतात.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक