शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांतच धरण भरले: नाशिककर निर्धास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 19:49 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने नाशिककर निर्धास्तगंगापूर धरणात ४६८२ दलघफू म्हणजे ८३ टक्के इतका पाणीसाठामागील वर्षी याच कालावधीत ७९ टक्के पाणीसाठा होता

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी वाहून गेल्याने यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने मुबलक पाणीसाठ्यामुळे नाशिककर निर्धास्त झाले आहेत.

गंगापूर धरणातील पाणीसाठ्यावर नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. दोन वर्षांपूर्वी, मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीमुळे गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने नाशिककरांनी पाणीकपातीच्या माध्यमातून टंचाईची धग अनुभवली होती. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. त्यानंतर, मागील वर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती परंतु, पुन्हा जायकवाडीसाठी पाणी जाण्याची चिंता होती. परंतु, तशी वेळ जलसंपदा विभागावर आली नाही. यंदा, फेब्रुवारीतच हवामान खात्याने सरासरी इतक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने नाशिककर सुखावले होते. जून आणि जुलै या दोन महिन्यांत वरुणराजाने नाशिक शहरावर कृपावृष्टी केली. आर्द्रा आणि पुनर्वसू तसेच पुष्य नक्षत्रातील पावसाने भरभरून हजेरी लावली. पावसाच्या संततधारेमुळे जुलैच्या मध्यातच गंगापूर धरणातून विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आणि लोकप्रतिनिधींनाही जलपूजनाची लवकर संधी लाभली. जुलै महिन्यात अधिक काळ गोदावरी दुथडी भरून वाहण्याची अनुभूती नाशिककरांनी घेतली. दि. ५ आॅगस्ट अखेर गंगापूर धरणात ४६८२ दलघफू म्हणजे ८३ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७९ टक्के पाणीसाठा होता.