शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेला प्राधान्य : वन्यजीवांचा अधिवास राहणार ‘समृध्द’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:45 IST

वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

ठळक मुद्दे२३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहेनैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणार असल्याचा दावा महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार

नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्ट्रसमृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आला आहेत. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेची मदत घेत वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित व ‘समृध्द’ रहावा यासाठी वन्यजीव भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महामार्गाच्या संरचनामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.‘समृद्धी’ महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून सुमारे १० जिल्हे, २६ तालुक्यांसह ३१२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम १६ भागांमध्ये विभागून पुर्णत्वास नेले जात आहे. समृद्धी महामार्ग जंगलांच्या भागातूनही जाणार आहे. तीन अभयारण्यक्षेत्रांच्या जवळून महामार्ग विकसीत होणार आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वन्यजीवांचा वावर असलेल्या भागामध्ये त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सुमारे २३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहे. त्यांची रचना त्या भागातील नैसर्गिक रचनेला अनुसरूनच असेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दाट वृक्षराजींनी वेढलेल्या तसेच काही प्रमाणात पाणथळ जागा तयार करून अंडरपास व ओव्हरपासची बांधणी करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यजीवांना महामार्गाच्या परिसरात सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.-या अभयारण्यांच्या झोनमधून ‘समृध्दी’समृध्दी महामार्ग तीन अभयारण्यांच्या नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कॉरिडोरमधून जात आहे. या अभयारण्यक्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास सुरक्षित रहावा यासाठी विशेष खबरदारी महामंडळाकडून महामार्ग बांधणी करताना घेतली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा, बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा, वशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ या तीन अभयारण्यांच्या क्षेत्रातून महामार्ग जाणार आहे. तसेच कसारा,इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील वनपरिक्षेत्राची माहिती करून घेत या दोन्ही तालुक्यांमधील वनपरिक्षेत्रांतर्गत महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिकwildlifeवन्यजीवGovernmentसरकारforestजंगल