शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

सुरक्षेला प्राधान्य : वन्यजीवांचा अधिवास राहणार ‘समृध्द’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:45 IST

वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

ठळक मुद्दे२३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहेनैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणार असल्याचा दावा महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार

नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्ट्रसमृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आला आहेत. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेची मदत घेत वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित व ‘समृध्द’ रहावा यासाठी वन्यजीव भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार महामार्गाच्या संरचनामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.‘समृद्धी’ महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून सुमारे १० जिल्हे, २६ तालुक्यांसह ३१२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे बांधकाम १६ भागांमध्ये विभागून पुर्णत्वास नेले जात आहे. समृद्धी महामार्ग जंगलांच्या भागातूनही जाणार आहे. तीन अभयारण्यक्षेत्रांच्या जवळून महामार्ग विकसीत होणार आहे. त्यामुळे वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वन्यजीवांचा वावर असलेल्या भागामध्ये त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार सुमारे २३ ते २५भुयारीमार्ग व उड्डाणमार्ग तयार केले जात आहे. त्यांची रचना त्या भागातील नैसर्गिक रचनेला अनुसरूनच असेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दाट वृक्षराजींनी वेढलेल्या तसेच काही प्रमाणात पाणथळ जागा तयार करून अंडरपास व ओव्हरपासची बांधणी करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यजीवांना महामार्गाच्या परिसरात सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करता येणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.-या अभयारण्यांच्या झोनमधून ‘समृध्दी’समृध्दी महामार्ग तीन अभयारण्यांच्या नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कॉरिडोरमधून जात आहे. या अभयारण्यक्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास सुरक्षित रहावा यासाठी विशेष खबरदारी महामंडळाकडून महामार्ग बांधणी करताना घेतली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा, बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा, वशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ या तीन अभयारण्यांच्या क्षेत्रातून महामार्ग जाणार आहे. तसेच कसारा,इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील वनपरिक्षेत्राची माहिती करून घेत या दोन्ही तालुक्यांमधील वनपरिक्षेत्रांतर्गत महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिकwildlifeवन्यजीवGovernmentसरकारforestजंगल