शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गोदावरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? याचिकाकर्त्या निशीकांत पगारे यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:36 IST

नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानंतर देखील प्रशासनाच्या कामकाजासंदर्भात सुधारणा होत नाही. नागरीक सकारात्मक असताना प्रशासन सकारात्मक नाही. जर कोणी नागरीकाने गोदावरीत कापडे धुतले तर त्याच्यावर कारवाई केली जाते, मग गटारी नदीत सोडणाºया अधिकाºयांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न गोदावरी प्रदुषण मुक्तीसाठी गेली सात वर्षे लढणाºया गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी केला आहे.

ठळक मुद्देप्रशासन प्रदुषण विषयावर गंभीर नाहीअवमान याचिका दाखल करण्याचा विचार

नाशिक-गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानंतर देखील प्रशासनाच्या कामकाजासंदर्भात सुधारणा होत नाही. नागरीक सकारात्मक असताना प्रशासन सकारात्मक नाही. जर कोणी नागरीकाने गोदावरीत कापडे धुतले तर त्याच्यावर कारवाई केली जाते, मग गटारी नदीत सोडणाºया अधिकाºयांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न गोदावरी प्रदुषण मुक्तीसाठी गेली सात वर्षे लढणा-या गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी केला आहे.प्रश्न: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन झाली परंतु त्यातील चर्चेनुसार प्रशासकिय खाते कामकाज करीत नसल्याचे दिसते, त्याविषयी काय म्हणाल?पगारे: खरे आहे. उच्चस्तरीय समिती ही न्यायालयाच्या आदेशानुसार आहे आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली काम करण्यासाठी ही समिती आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक शासकिय अधिकाºयांना त्याचे गांभिर्य नाही. एमआयडीसीचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नाही की, कोणत्याही निर्णयाला प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे आयुक्तांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच नव्हे तर अनेक खात्याचे अधिकारी गोदावरी प्रदुषण मुक्ती हे दुय्यम स्थानी मानतात.प्रश्न: या सर्व प्रकरणात नागरीकांचा प्रतिसाद कसा वाटतो?पगारे: गोदावरी नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठी नागरीकांचा प्रतिसाद वाढु लागला आहे. नागरीक स्वेच्छेने नदीपात्राची स्वच्छता देखील करतात. परंतु प्रशासकिय अधिकारी त्यांना साथ देत नाही. प्रबोधन असो की, कारवाई प्रशासकिय अधिकाºयांचा मात्र सहभाग नसतो. त्यांना त्याची गरज पडत नाही.प्रश्न: प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आता त्यावर काय कारवाई करणार?पगारे: खरे तर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून देखील विविध खात्याचे अधिकारी गंभीर होत नाही. सर्व सामान्य नागरीकाने नदीपात्रात कपडे धुतले तर त्याच्यावर कारवाई होते, मात्र अधिकाºयांनी गटारीत पाणी सोडले तरी त्यावर कारवाई का होत नाही याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याने अवमान याचिका दाखल करायची काय याचा विचार सध्या सुरू आहे. मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण