शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मखमलाबादच्या एका कोपऱ्यात कोणाला विकास हवाय?

By संजय पाठक | Updated: February 10, 2019 00:19 IST

ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीचा तुकडा असेल किंवा ज्या जमिनीवर गुंठेवारीचे व्यवहार झाले आहेत, त्याविषयी काय हे आज स्पष्ट केले जात नाही.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या अपारदर्शी कारभाराने गोेंधळव्यवसायिक- राजकिय नेते असलेले शेतकरी सर्वात पुढेविश्वासात न घेताच प्रकल्पाची आखणी

संजय पाठक/ नाशिक - कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव हा लोकानुकूल हवा असेल तर त्यासाठी आधी लोकांना विश्वासात घेणे महत्वाचे असते आणि ते शक्य नसेल तर काय होते त्याचे स्वच्छ उदाहरण म्हणजे स्मार्ट सिटीचा मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकल्प होय. संबंधीत नागरीकांना त्याचे आकलन होण्याच्या आत ज्या घाईगर्दीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ते बघता शेतकºयांना प्रशासनाची घाई संशयास्पद वाटणे अगदी स्वाभाविक आहे. मग अशावेळी प्रस्तावाला विरोध होऊन तो रखडणार नाही तर काय होणार?

नाशिक महापालिकेने शहर स्मार्ट करण्यासाठी उसने अवसान म्हणून स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केली आणि आहे ती स्वायत्तता हरवून मनस्ताप ओढावून घेतला आहे. रखडलेली कामे हा कंपनीच्या कामकाजाचा एक अविभाज्य भाग बनला आहे सहाजिकच आधी कालीदास कालीदास कला मंदिर, मग नेहेरू उद्यान त्यानंतर विद्युत शवदाहीनी आणि आता मखमलाबाद येथील प्रकल्पाचे रखडणे हे स्वाभाविक झाले आहे. शहराच्या एका कोप-यात एका वर्गाला विशेष वागणूक देण्यासाठी मुळातच अशाप्रकारचा विषमता निर्माण करणारी स्मार्ट नगरी स्थापन करणे म्हणजे उर्वरीत भागातील नागरीकांवर एकतर अन्याय करण्यासारखे किंवा मग ज्यांच्याकडे मुलभूत सुविधाच नाही त्यांच्याजखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. परंतु जे अनेक लोकप्रतिनिधी आज मखमलाबाद येथील अशा प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ते सभागृहात असताना २०१५ मध्येच स्मार्ट सिटीचा आराखडा तयार झाला आणि तोच शासनाने मंजुर केला आहे. परंतु आता राजकिय लाभासाठी शेतक-यांचे कैवारी बनून सर्व संबंधीत फिरत आहेत.

मखमलाबाद येथील साडे सातशे एकर शेती क्षेत्र एकत्र करून त्याठिकाणी नगररचना योजना राबविण्यात येईल आणि त्यानंतर फायनल प्लॉट शेतक-यांना दिले की, मग जागेचे भाव वाढणार वगैरे असे सांगितले जात आहे. ग्रीन फिल्ड किंवा हरीत क्षेत्र असे त्यासाठी नाव देण्यात आले आहे. मात्र मुळातच दिसते तेवढे सोपे आणि लाभदायी असे हे प्रकरण नाही. जमिन व्यवहारांची तांत्रिकता वाढवणारा हा प्रकार असून त्यामुळे सामान्यांच्या डोक्याबाहेर आहे. नक्की आपल्या जमिनीचे काय होणार हे अनेकांना माहितीच नाही. परंतु दोन चार हुशाार कथीत शेतकरी कम राजकिय नेते सांगतील त्यांच्यामुळे आधीच संभ्रम त्यात प्रशासनाचे एकेक उपाय यामुळे सामान्य नागरीक आधीच बुचकळ्यात पडले आहेत. त्यातच स्मार्ट सिटीच्या अपारदर्शक कार्यपध्दतीने प्रकल्पासाठी आधी शेतक-यांशी संंवाद साधून त्यांना राजी करणे त्यांना लाभाचे गणित मांडून सर्वाेक्षणासाठी अनुकूलता मिळवणे हे सर्व कामे उलट्या क्रमवारीने होत आहेत. त्यावर आता दिलासा देण्यासाठी स्मार्ट सिटीचे संचालक आणि महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन फॉर्मुले मांडले आहेत. त्यात शेतक-यांकडे किती जमीन असेल तर त्याला काय द्यावे लागेल आणि कंपनी काय देणार अशाप्रकारचे लाभाचे गणित मांडले आहेत.

ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीचा तुकडा असेल किंवा ज्या जमिनीवर गुंठेवारीचे व्यवहार झाले आहेत, त्याविषयी काय हे आज स्पष्ट केले जात नाही. शेतजमिनी म्हंटले की अनेक प्रकारचे न्यायालयीन वाद आणि कोर्ट कज्जे असतात. अशा जमिनींचे काय हे देखील सांगितले जात नाही अडचणी न मांडता केवळ सुखावह जे आहे तेच सांगितले जात असल्याने खरे शेतकरी अधिक अडचणीत आहेत. त्यामुळेच प्रकल्प रखडण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी