शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

रात्रीची संचारबंदी आहे तरी कुठं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:01 PM

नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या व्यक्तींवगळता कोणीही रस्त्यांवर भटकंती करणार नाही तसेच मास्कविना चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत ठिय्या देत गप्पांचे फड रंगविण्यासही बंदी घालण्यात आली आहे; मात्र आयुक्तालयातील काही भागांमध्ये याविरुद्ध चित्र रात्रीच्यावेळी पहावयास मिळत आहे. यामुळे रात्रीची संचारबंदी आहे तरी कुठं, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

ठळक मुद्देचौकाचौकांत टोळक्यांचा ठिय्या : रात्री उशिरापर्यंत जुने नाशिक, नाशिकरोड भागात रेलचेल

नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा देणाऱ्या व्यक्तींवगळता कोणीही रस्त्यांवर भटकंती करणार नाही तसेच मास्कविना चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत ठिय्या देत गप्पांचे फड रंगविण्यासही बंदी घालण्यात आली आहे; मात्र आयुक्तालयातील काही भागांमध्ये याविरुद्ध चित्र रात्रीच्यावेळी पहावयास मिळत आहे. यामुळे रात्रीची संचारबंदी आहे तरी कुठं, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला असून, बुधवारी संध्याकाळपर्यंत नवे ४२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शहराचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७९ हजारांच्या पुढे सरकला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे.

कलम १४४च्या कायद्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कोणीही विनाकारण रस्त्यांवर भरकटणार नाही, असे स्पष्ट आदेश असतानाही शहरातील जुने नाशिक, पाथर्डी फाटा, नाशिकरोड आदी भागांमध्ये मध्यरात्री साडेबारा ते १ वाजेपर्यंत रेलचेल पहावयास मिळत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रमुख चौकांमध्ये पोलीस नजरेस पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संध्याकाळी जलतरण तलाव येथे नाकाबंदी करण्यात येत होती; मात्र रात्री ११ वाजेनंतर गरवारे पॉइंटपासून पुढे थेट द्वारकेपर्यंत पोलिसांची नाकाबंदी दिसून आली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस