शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सोहळ्यांमुळे अर्थचक्राला पुन्हा गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

तुलसी विवाह झाल्यानंतर लग्नमुहूर्तांना सुरुवात झाली होती. मात्र, त्या प्रारंभीच्या काळात असलेल्या कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांना ...

तुलसी विवाह झाल्यानंतर लग्नमुहूर्तांना सुरुवात झाली होती. मात्र, त्या प्रारंभीच्या काळात असलेल्या कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांना अवघे ३० टक्क्यांपर्यंतच बुकिंग मिळत होते. नियमांच्या बंधनामुळे पूर्ण क्षमतेने विवाहसोहळे होत नसल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली होती. नाशिक शहरात शंभरहून अधिक तर जिल्हाभरात सुमारे ३०० हून अधिक लॉन्स आहेत. ग्रामीण भागातही लॉन्समध्येच लग्न करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने प्रत्येक तालुक्याच्या गावातही १५ ते २० लॉन्स आहेत. जिल्ह्यातील काेणत्याही दाट तारखेला शंभर कोटींची उलाढाल जिल्हाभरात एका दिवसात होते. एका हंगामात सुमारे ६० तारखा असतात. त्यात काहींना सर्व तारखांना तर काही १०-२० कमी तारखांना लॉन्सचे बुकिंग मिळते. दाट तारखांना तर काही वेळा सकाळ आणि सायंकाळी असे दोन्ही वेळचे बुकिंग असते, तर ऑफ सीझनला एकदा बुकिंग असले तरी खर्च भागतो. मात्र, करोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर सरकारने जमावबंदी आदेश लागू केले होते. एकमेकांशी संपर्क टाळणे आवश्यक असल्याने सार्वजनिकरीत्या होणाऱ्या विवाहांवर बंधन टाकले होते. त्यामुळे अनेक विवाहसोहळे पुढे ढकलले गेले होते. अनेकांनी ते घरच्या घरी एका दिवसात साधेपणाने ते उरकून घेतले होते. अन्य सर्वच अर्थव्यवस्था रुळावर येत असताना विवाहाचे सोहळेदेखील पूर्वीच्या जोमाने होऊ लागल्याने हळूहळू या व्यवसायावरील मळभ दूर होऊ लागले आहे. यंदा फेब्रुवारीत अवघे दोन, तर एप्रिलमध्ये सात मुहूर्त आहेत. तर मे महिन्यात सर्वाधिक १५ तारखा असून, जूनमध्ये सात, तर जुलैमध्ये चार मुहूर्त आहेत. त्यामुळे गत वर्षी हुकलेले मुहूर्त यंदा तरी पदरात पाडून घेता येणार असल्याने लॉन्सचालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या आणि निगडित असलेल्या अनेक लहान-मोठ्या व्यवसायांनादेखील उर्जितावस्था मिळू शकणार आहे.