शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 6:42 PM

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.1973 सालात प्रथमच चणकापूर प्रकल्प कोरडाठाक झाला होता. तर पुनंद प्रकल्पात मृतसाठा होता. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य हवालिदल झाले होते. मात्र 21 ते 31 जुलै 2019 दरम्यान कोसळधार झालेल्या पावसाने या प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाल्याने हजारो दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांसह 82 गावातील पाणीयोजनांना संजीवनी मिळाली होती. तर या पावसाने तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंपरी, धार्डेदिगर, खिराड, ओतूर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघूप्रकल्प पूर्णक्षमतेने भरले होते. यंदा 2814 दलधफू क्षमतेच्या चणकापूर प्रकल्पात आजअखेर 590 दलधफू पाणी साठा असून 320 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी या काळात 365मिमी पाऊस, तर पाणीसाठा 1191 दलघफू होता. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून 2500 क्युसेकने तर चणकापूर उजव्या कालव्यातून 60 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तसेच 1404 दलघफू क्षमतेच्या पुनंद प्रकल्पात आजअखेर 422 दलघफू साठा असून गतवर्षी या काळात 653 दलघफू पाणीसाठा होता. त्यातूनही मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु होता. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील लघु सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य वरूणराजाच्या कोसळण्याची आस बाळगून आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण