शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:43 AM

विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे राज ठाकरे विरोधी पक्षनेते होणार नाहीत

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. राज ठाकरे हे बळ नसलेले नेते असल्यामुळे ते विरोधी पक्षनेते होणार नाहीत, त्यासाठी त्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला.नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार स्वबळावर निवडून येण्याइतपत पक्षाची ताकद नसल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी झालो. त्यात रिपाइंला सहा जागा देण्यात आल्या. एका जागेवर सेनेचा उमेदवार असून, पाच जागा रिपाइं लढत आहे. रिपाइंच्या सर्व उमेदवार कमळाचे चिन्ह घेऊन लढत असले तरी, विधिमंडळात त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला असल्याचेही आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा युतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा आठवले यांनी केला असून, आपल्या उमेदवारांनी कमळाचे निवडणूक चिन्ह घेतले म्हणून आपण भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षनेते पदासाठी जनतेकडे कौल मागितल्याच्या प्रश्नावर बोलताना आठवले यांनी राज ठाकरे हे बळनसलेले नेते असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही. त्यासाठीत्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असे सांगितले.पवारांवर गुन्हा चुकीचाचईडीने शरद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे चुकीचे असून, पवार हे कोणत्याही बॅँकेत संचालक नव्हते. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला असावा, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाworli-acवरळी