शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:04 IST

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे गुरुवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये वितरण होणार आहे.

नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे गुरुवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये वितरण होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता लागली आहे. गेल्या १९ फेबु्रवारी रोजी लोकमतच्या नाशिक शहर कार्यालयात झालेल्या ज्युरी मंडळाच्या बैठकीत बारकोड पद्धतीने विविध १३ कॅटेगिरीमधील सरपंचांची निवड निश्चित करण्यात आली असून, ही सर्व नावे गुलदस्त्यात आहेत.गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या विजेत्या सरपंचांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.शीतल सांगळे, बीकेटीचे महाराष्टÑातील अ‍ॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरज धुत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनंत राजेगावकर आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील जयंत पाटील तसेच महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहेत. राज्यात लोकमतने प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध कॅटेगिरीमध्ये जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक सरपंचांनी प्रवेशिका दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. या सोहळ्यास स्पर्धेत सहभागी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे.११ कॅटेगिरीसह दोन विशेष पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण इ. प्रशासन/लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान या ११ कॅटेगिरीत केलेल्या कामांची दखल घेऊन या प्रत्येक क्षेत्रासाठी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ दिले जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहाणारे जयंत पाटील हे सन १९९५ पासून कुर्डुवाडी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणून कार्यरत आहेत. २००३ मध्ये त्यांनी राज्यस्तरीय सरपंच संघटनेची स्थापना केली. २००४ मध्ये त्यांनी कुर्डुवाडी येथे पहिले राज्यस्तरीय सरपंच अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात राज्यभरातील १४ हजार सरपंच उपस्थित होते. सध्या ते ग्रामविकास मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अर्चना जतकर या पुसदच्या माजी सरपंच असून, दोन पंचवार्षिक त्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंचायतराज आणि आमचं गाव आमचा विकास या दोन संस्थांवर त्या तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटNashikनाशिक