शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नाशकात आलेला ११० उंटांचा कळप तस्करी? पोलिसांचा अहवाल 'लोकमत'च्या हाती

By अझहर शेख | Updated: May 8, 2023 14:06 IST

मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांनी नाशिकच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला.

नाशिक - शहरातील तपोवनात तीन दिवसांपुर्वी दाखल झालेला शंभर उंटांचा कळपाने सर्वच अवाक् झाले अन् सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली. कोणी म्हणे कत्तलीसाठी उंटांची तस्करी होत आहे, तर कोणी म्हणे हे उंट राजस्थानकडून तस्करीच्या इराद्याने नाशिकमध्ये आणले गेले तर काहींनी हैदराबादला कत्तलीसाठी पाठविण्याची तयारी असल्याचाही कयास सोशलमिडियावर  लावला. मात्र या सर्व चर्चा निरर्थक व अफवा ठरत असल्याचे सटाणा पोलिसांनीपोलिस अधिक्षकांना दिलेल्या अहवालानंतर स्पष्ट होत आहे. उंटपालन करणारे लोक ‘मदारी’ म्हणून मागील २५ ते ३०वर्षांपासून नाशकातील तपोवनात वास्तव्यास असून त्यांच्या आधारकार्डांवरही येथील पत्ता असल्याचे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे.

शहरामध्ये दाखल झालेले उंट हे राजस्थानमधून आल्याचा दावा सोशलमिडियाद्वारे काही लोकांकडून केला जात होता. मात्र, सटाणा पोलिसांनी बुधवारी (दि.३) पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांना उभा उंटांच्या माहितीबद्दल दिलेला अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. हे सर्व उंट गुजरातमधील नर्मदा, तापी खोऱ्यातून सटाणा, देवळामार्गे नाशिक शहराकडे आले. कारण सर्व उंटपालक हे येथील तपोवन झोपडपट्टी, आडगाव मेडिकल कॉलेज परिसरात वास्तव्यास आहे. ते आपल्या ताब्यातील उंटांना चारण्यासाठी होळीच्या अगोदर गुजरातकडे गेले होते, असे अहवालात म्हटले आहे. 

मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांनी नाशिकच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. पावसाळा सुरू होण्यापुर्वी त्यांना नाशिकमध्ये पोहचायचे होते. कारण, याठिकाणी त्यांची झोपडीवजा घरे आहेत, अशी नोंद सटाणा पोलिसांनी स्टेशन डायरीला असून अहवालातही नमूद केले आहे. त्यामुळे कत्तलीसाठी उंटांची तस्करी होत असल्याच्या चर्चेवर ग्रामिण पोलिसांच्या अहवालाने पुर्णविराम लागला आहे.

२९एप्रिलला सटाण्यात मुक्काम!

मागील महिन्याच्या २९तारखेला ३३उंटांना घेऊन ६पुरूष, ११ महिला, १५ लहान मुले असा संपुर्ण कबिला २उंटगाड्यांसह सटाणा शहरात मुक्कामी होता. दुसऱ्यादिवशी ३०एप्रिल रोजी त्यांचा दुसरा कबिला सटाण्यात ४९उंटांसह दाखल झाला. त्यासोबत ५पुरूष ७ महिला व १४ लहान मुले होती. या दोन्ही कबिल्यांची सटाणा पोलिसांनी नोंद घेऊन देवळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कंधाणे फाटा, पिंपळदर, मांगबारीमार्गे नाशिक शहराच्या दिशेने सोडले.

उंटांवरच भागते पोटाची भूक !

उंटपालनकर्ते हे मागील २५ ते ३० वर्षांपासून ‘मदारी’ म्हणून नाशिक शहरात वास्तव्यास असल्याचा पोलिसांचा अहवाल सांगतो. उंटांचे पालन करत त्याद्वारे खेळ करणे, लहान मुलांना उंटांवर बसून शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये तपोवन, गोदाकाठसारख्या प्रेक्षणिय ठिकाणी फेऱ्या मारत त्याचे १० ते २०रूपये घेणे आणि लग्नकार्यात नवरदेवाला बसण्यासाठी उंट भाडेतत्वावर देणे अशाप्रकारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

होळीपुर्व सोडले नाशिक

उंट पालनकर्त्यांनी होळी सणाच्याअगोदर नाशिकमधून हरसूल, पेठ, नानापोंडा, वापीमार्गे ते गुजरातच्या दिशेने स्थलांतर केले होते. त्यानंतर तेथे वास्तव्य करत पुन्हा दीड महिन्यांपासून त्यांनी उंटांना घेऊन नाशिकच्या दिशेने परतीचा प्रवास पायी सुरू केला होता. हे सर्व तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमाजवळील साधुग्रामभागातील झोपडपट्टीकडे येत होते.

आधारकार्डांच्या प्रती घेऊन सोडले

सटाणा पोलिसांनी चौकशी करत संबंधितांच्या आधारकार्ड तपासून त्याच्या प्रतींसह मोबाइल क्रमांक नोंदवून घेऊन त्यांना नाशिकच्या दिशेने प्रवास करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ दिला. ३३उंटांच्या कबिल्यासोबत शिवा मदारी सय्यद (३५,रा.तपोवन), गोलू मेहताव मदारी (दोघे रा.कुंभमेळा स्टॅन्ड, तपोवन), ४९ उंटांच्या कबिल्यासोबत सलमान सलीम सय्यद (२४,रा.तपोवन) अब्दुल सलीम सय्यद (२५रा.मेडिकल कॉलेजजवळ आडगाव), जमाल करीम सय्यद (४५,रा.तपोवन) यांचा समावेश होता, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसGujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी