शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ताहाराबादला सत्तेसाठी रंगणार रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 20:34 IST

ताहाराबाद : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीवेळी झालेल्या चार बिनविरोध निवडीनंतर तेरा जागांसाठी तब्बल ३१ उमेदवारांनी आपले नशीब निवडणूक ...

ठळक मुद्देचुरशीच्या लढती : बिनविरोध उमेदवारांची भूमिका निर्णायक

ताहाराबाद : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीवेळी झालेल्या चार बिनविरोध निवडीनंतर तेरा जागांसाठी तब्बल ३१ उमेदवारांनी आपले नशीब निवडणूक रिंगणात आजमावले. यात सत्ताधारी गटाच्या श्री गुरुदत्त पॅनलला सात, तर विकास पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या मात्र बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या हातात आहेत. त्यामुळे या ठिकाणी सत्तेसाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे.

अतिशय अटी-तटीच्या लढतीत निवडणूक झाली. वॉर्ड क्रमांक १ मधून अनुसूचित जाती पुरुष जागेसाठी निखिल राजेंद्र कासारे, महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी प्रमिला सुभाष नंदन, सर्वसाधारण जागेसाठी डॉ. नितीन विजय पवार हे विजयी झाले.वॉर्ड क्रमांक दोनमधून अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी जीवला दलपत माळी, अनुसूचित जमाती महिला जागेसाठी भारती अजय सोनवणे हे विजयी झाले. या वॉर्डात महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी शीतल योगेश नंदन बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक तीनमधून महिलांचा मागास प्रवर्ग जागेसाठी कल्पना सुनील जाधव व अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी यशवंत लक्ष्मण पवार दोन्ही बिनविरोध निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी भाग्यश्री किशोर साळवे यांनी आपल्या आत्या वंदना वसंत नंदन यांचा पराभव केला.

नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष जागेवर तुषार नामदेव अहिरे विजयी झाले. गावात लक्ष्यवेधी ठरलेल्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष जागेवर माजी सरपंच सीताराम तुकाराम साळवे यांनी त्यांचे पुतणे माजी सरपंच संदीप मधुकर साळवे, मिलिंद सुधाकर चित्ते, जगदीश साळवे यांचा पराभव केला. सर्वसाधारण जागेसाठी दोन्ही कांकरिया बंधूंमध्ये झालेल्या लढतीत निलेश सुभाष कांकरिया यांनी माजी उपसरपंच प्रदीप कांतीलाल कांकरिया यांचा पराभव केला. महिला सर्वसाधारण जागेसाठी शोभा अशोक कांकरिया विजयी झाल्या.वॉर्ड क्रमांक सहामधून अनुसूचित जमाती महिला जागेसाठी जिजाबाई मुरलीधर वनिस, अनुसूचित जमाती पुरुष जागेसाठी राजेश सजन माळी, महिला सर्वसाधारण जागेसाठी प्रीती सचिन कोठावदे विजयी झाल्या.सरपंच आरक्षणाकडे लक्षनिवडणूक झालेल्या तेरा जागांपैकी सत्ताधारी गुरुदत्त पॅनलला सात, तर विकास पॅनलला सहा जागांवर विजय मिळविता आला आहे. चार बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांच्या हातात आता सत्तेच्या चाव्या आहेत. बिनविरोध निवडून आलेले चार सदस्य कशी भूमिका बजावतात, यावर सत्तेचे समीकरण ठरणार आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार असून, सरपंचपदाच्या आरक्षणाकडेही लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक