शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

शहरांमध्ये जलबचतीसाठी ‘लादलेली टंचाई’ उपयुक्त: उत्तमराव निर्मळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 4:31 PM

नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भागातील नागरीकांना पाण्याचे महत्व समजावयाचे असेल तर लादलेली टंचाई हा प्रयोग योग्य असल्याचे मत जल चळवळतील कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी केले.

ठळक मुद्देजलदिनाच्या पूर्वसंध्येला सुचवले उपायलोकशिक्षणाची गरज

नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भागातील नागरीकांना पाण्याचे महत्व समजावयाचे असेल तर लादलेली टंचाई हा प्रयोग योग्य असल्याचे मत जल चळवळतील कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी केले. रविवारी (दि.२२) जलदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकमतने संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली.

प्रश्न- सर्वच शहरात विशेष महापालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळपट्टी होते, त्याबद्दल काय सांगाल?निर्मळ: शहरी भागात लोकसंख्या जास्त असते आणि लोकांची घनता असल्याने सरकारचे शहरी भागाताकडे विशेष लक्ष असते. शहरी भागात पाणी पुरवठ्यासाठी विशेष लक्ष पुरवले जाते. पाणी पुरवठा योजनांसाठी निधीही दिला जातो राज्यात बहुतांश महापालिकांच्या धरणातून थेट जलवाहिनी योजना आहेत. मात्र त्यानंतरही शहरी भागात पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. मुबलक पाणी असेल तर त्याचे महत्व राहात नाही त्यामुळे पाण्याची उधळपट्टी होते.

प्रश्न: शहरी भागात देखील पाणी पुरवठा विस्कळीत होतो ना?निर्मळ : शहरी भागात मुबलक पाणी पुरवठा होत असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पायाभूत सुविधा कशा आहेत, त्यावर खूप अवलंबून असते. शहरात मुबलक पाणी असले तरी त्यात अनेकदा विषमता असते. कमकुवत पायाभूत सुविधांमुळे असे घडते. ज्या भागात ओरड होते. किंवा नगरसेवक ओरड करतात. त्या भागात जादा पाणी पुरवले जाते. अन्य भागात मात्र तसे होत नाही. त्यामुळे ही एक मोठी समस्या आहे.

प्रश्न: जलसंपत्ती नियामक प्राधीकरणाने अनेक नियम केले आहेत. दरडोई पाणी ुपुरवठ्यात घट केली आहे. त्यामुळे उधळपट्टी थांबेल अस वाटते का?निर्मळ: जलसंपत्ती नियामक प्राधीकरणाने अनेक नियम केले आहेत. त्याअंतर्गत ५० लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांना दीडशे ऐवजी १३५ लिटर्स दरडोई पाणी पुरवठा करऱ्यात येणार आहे. तथापि, केवळ कायद्याची आदर्श अंमलबजावणी झाली असती तर रामराज्य निर्माण झाले असते. पाण्याची उधळपट्टीत थांबवायची असेल तर लोकशिक्षण करण्याची गरज आहे. आणि ती होत नसेल तर लादलेली टंचाई हा प्रयोग नागरीकांना निश्तिचत धडे देईल. एक मात्र नक्की की या सर्व बाबींचा निरंतर विचार व्हायला हवा. केवळ जलदिन साजरा करण्याचे सोपस्कार शासकिय यंत्रणांनी करू नये तर पाणी बचतीचे महत्व निरंतर असावे. तर बचतीची सवय लागेल.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई