शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव परिसरात संततधार

By admin | Updated: July 24, 2014 01:02 IST

मालेगाव परिसरात संततधार

मालेगाव : गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविलेल्या पावसाचे आगमन झाले असून, रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या खरीप पेरण्यांच्या कामांना वेग येणार असून, रिमझिम पावसावर पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.
मालेगाव तालुक्यात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. खते, बी-बियाणे यांचा
साठा करून ठेवलेले व्यावसायिक बियाणे खरेदीसाठी शेतकरी फिरकत नसल्याने चिंतित होते. तालुक्यात रिमझिम पावसावर सुमारे १५ ते २० टक्के खरिपाच्या पेरण्या झालेल्या होत्या. आता सुरू असलेल्या
पावसामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पेरण्या होऊ शकतील, असे तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी
सांगितले.
तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला होता, जनावरांचेही चाऱ्याअभावी हाल होत होते. तालुक्यातील माळमाथ्यावरील सायने, रोझे, मालनगाव, सिताणे आदि गावांमध्ये पेरण्याच झालेल्या नव्हत्या. पाऊस सुरू झाल्याने तेथील पेरणी कामांना वेग येणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत. बाजरी, मका आणि कडधान्ये यांचे पीक चांगले येईल तर भुईमूग पिकाच्या क्षेत्रात घट होईल, असे शेवाळे यांनी सांगितले. पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलमय झाले असून, नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. (प्रतिनिधी)