शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे

By admin | Updated: November 16, 2016 00:35 IST

रांगांमुळे सामान्य नागरिकांचेच हाल : आदित्य ठाकरे

नाशिक : एका रात्रीतून नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिकांचेच प्रचंड हाल होत असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. नाशिक येथील विद्यार्थ्यांना टॅब वितरणासाठी आदित्य ठाकरे आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांची दप्तरापासून सुटका करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असून, त्यासाठी मुंबई महापालिकांतर्गत तब्बल ४८० शाळांमधील १० हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले आहे. मुंबईमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आले असून, वितरित करण्यात आलेल्या टॅबमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी भाषांतील शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या टॅबमध्ये नवनितच्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून डिजिटल रूपात पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी टॅबचे वितरण करण्यात यावे अशी मागणी मागील वर्षीच आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली असून, त्यावर सरकारने निर्णय घेणे अद्याप बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना अडचणी येत आहे. शिवसेनेची याबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे युटीलिटी पेमेंट पाठविण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)