शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:53 IST

हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार धरू अशी अंतिम ताकीद दिली जाते.

ठळक मुद्देजोडीदाराची विवेकी निवड उपक्रम सुरू शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

नाशिक-  बीड येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून हत्याकांड घडले. भाग्यश्री वाघमारे या मुलीच्या भावाने म्हणजेच बालाजी लांडगे याने तीच्या पतीची रोहीत वाघामारे याची हत्या केली. आॅनर किलींग किंवा आंतरजातीय विवाह केला म्हणून हत्या करण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र त्यावर पायबंद आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या जात पंचायत मूठ माती अभियानाचा विषय हाताळणारे आणि या विषयासाठी राज्यस्तरावर काम करणारे प्रदेश कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली. त्याच बरोबर अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याचा हरीयाणा पॅटर्न उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. प्रश्न: आॅनर किलींग या प्रकाराच्या विरोधात सुरू असलेली मोहिम आणि बीडची घटना याबाबत काय वाटते?चांदगुडे: आंतरजातीय विवाह केल्यानंतर उभयतांच्या कुटूंबियांपैकी कोणाचा विरोध असेल तर त्यातून होणा-या हत्याकांड किंवा सामाजिक बहिष्काराचे प्रकार नवे नाहीत. २०१३ मध्ये अशाच प्रकारे जात पंचायतीमुळे आंतरजातीय विवाह करणा-या मुलीला शिक्षा मिळाली. त्यामुळे महाराष्टÑ अंनिसने या विषयाला हात घातला. त्यामुळे जातीयवाद करणा-या जातीय पंचायतींना चाप बसला. तसेच राज्य सरकारला कायदाही करावा लागला. बीड मधील घटनेचे मुळ कारण अद्याप तपासले जात आहे.प्रश्न: अंनिसने याबाबत काय जागृती केली आहे.चांदगुडे: जात पंचायत मूठमाती अभियान अंनिसने राबविले आणि त्यानंतर सरकारला कायदा करावा लागला हे सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यापलिकडे जाऊन जोडीदाराची विवेकी निवड उपक्रम सुरू केला आहे. आंतरजातीय विवाह करताना जोडीदाराची किती विवेकाने निवड झाली आहे हे आधी तपासले जाते. मगच त्यांना मदत केली जाते. सुरूवातीला तर मुला मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजावला जातो. त्यानंतर मुले परिपक्व नसतील तर त्यांची समजूतही काढली जाते. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही लाभत आहे. प्रश्न: बीड सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करता येईल?चांदगुडे: आंतरजातीय विवाहातून होणारे जातीतील वाद आणि जात पंंचायतीने त्यावर दिलेले आदेश असे प्रकार यापूर्वी घडले होते. त्यामुळे त्यावर सरकारने कायदा केला आहे. परंतु हरीयाणामध्ये याबाबत वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार धरू अशी अंतिम ताकीद दिली जाते. शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात असे मी बघितले आहे त्यामुळे महाराष्टÑात अशाप्रकारचे शेल्टर होम सुरू झाले पाहिजे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला आम्ही दिला आहे त्याच बरोबर सध्या आंतरजातीय विवाह करणा-यांना राज्य सरकार पन्नास हजार रूपये देते त्यात वाढ करून राजस्थान सरकारप्रमाणेच दोन लाख रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची देखील मागणी केली आहे तूर्तास हरीयाणाच्या धर्तीवर शेल्टर होम उभारण्याच्या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत.मुलाखत: संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक