शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आपत्ती व्यवस्थापनाची तयारी झाली?

By संजय पाठक | Published: May 16, 2019 10:06 PM

नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी गटारी तुंबल्या की, लोकांनी प्लास्टीकच्या कॅरीबॅगा फेकल्यानेच ही समस्या उदभवल्याचा ठपका देखील ठेवला जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वाडे आणि काजी गढीचा प्रश्न हा सोडविला गेला ना सुटेल. परंतु दुर्घटना घडली की दोष मात्र वाडेकऱ्यांनाच दिला जाईल.

ठळक मुद्देगोदावरीतील अतिक्रमणे जैसे थेगावठाणातील वाड्यांवर निर्णय नाहीआपत्ती व्यवस्थापनासमोरच आपत्ती

संजय पाठक. नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी गटारी तुंबल्या की, लोकांनी प्लास्टीकच्या कॅरीबॅगा फेकल्यानेच ही समस्या उदभवल्याचा ठपका देखील ठेवला जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वाडे आणि काजी गढीचा प्रश्न हा सोडविला गेला ना सुटेल. परंतु दुर्घटना घडली की दोष मात्र वाडेकऱ्यांनाच दिला जाईल.

खरे तर पावसाळा ही यंत्रणेसाठी इष्टापत्तीच असते. मुंबईत नाले सफाईत घोटाळे होतात तसे येथेही उघड होतात. परंतु त्याचे पुरावे नसतात. नाशिक महापालिकेने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पावसाळी गटार योजना साकारली. सुमारे तीनशे कोटी रूपयांच्या योजनेने काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी गटार योजना ज्या भागात केली आहे. तेथेही पाणी साचते. मग, पावसाळी गटारीचा महाघोटाळा टाळण्यासाठी पावसाला म्हणजे निसर्र्गालाच दोषी धरले जाईल.

आता महापालिकेने पावसाळा पूर्व कामांची लगबग सुरू केली आहे. नाले सफाई सुरू आहे. गावठाण भागातील मोडकळीस आलेल्या वाड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. परंतु अशा सर्व तयारी मुळे सर्वच ठिकठाक होईल असे नाही याचे मुळ कारण अनेक बाबतीत स्थायी तोडगा काढणे शक्य असून तो कधीही काढला जात नाही. गेल्या वर्षी तांबटलेनमधील काळे वाडा पडून दोन जण ठार झाले होते. त्यानंतर गावठाण भागात क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय चर्चिला गेला. राजकिय नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात कलस्टर मंजुर झालेच नाही. असे अनेकबाबतीत घडते. काजीची गढी हा सर्वाधिक धोकादायक भाग. तो खासगी जागेवर असल्याने त्याचा तिढा सुटलेला नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा नदीपात्राचा असून नदीपात्रातील अतिक्रमीत बांधकामे त्यातील अवरोध होईल असे अडथळे जैसे थे आहे. त्यामुळे सराफ बाजार आणि अन्यत्र पाणी शिरणारच!

मग हे सर्व होणार असेल तर पावसाळा पूर्व कामांची सज्जता झाली असे म्हणता तरी कसे येईल. एकुणातच आव्हानासाठी सज्जता म्हणायला ठीक आहे. परंतु सर्वच जैसे थे असेल तर आपत्ती कशी टळणार? 

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस