शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

दंडही हवाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:56 AM

पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा.

साराशकिरण अग्रवालपाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच अशी स्वच्छता मोहीम राबविली जाते. नित्य-नैमित्तिक पातळीवर जी सफाई राहून जाते ते ‘ब्लॅक स्पॉट’ हेरून ते यानिमित्ताने स्वच्छ केले जातात. त्यामुळे अशा मोहिमा उपयोगी निश्चितच ठरतात. पण त्या राबविल्या जाताना त्याकडेही केवळ शासकीय उपचार म्हणून पाहणाºयांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे, जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाणेही आवश्यकच ठरावे. विशेष म्हणजे नाशकात स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन कचरा संकलित केला गेला. यासाठी २८ हजारांवर नागरिकांचा सहभाग लाभला, ज्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय होते. पण या गर्दीत विद्यार्थी व सामान्य नागरिक ज्या प्रामाणिकपणे सफाई करताना दिसून आले, तसे शासकीय कर्मचारी व राजकीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत अपवादानेच दिसू शकले. स्वत: पालकमंत्री महाजन सक्रियपणे स्वच्छता करत असताना अनेकांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहात ‘सेल्फी’ काढून चमकोगिरी करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी मानसिकता असताना विरोधी पक्षीयांनीही यासाठी फारसा उत्साह किंवा सहभाग दाखविलेला दिसून येऊ शकला नाही. उलट अशी मोहीम एक दिवस राबवून फोटोसेशन करून घेण्याऐवजी रोज स्वच्छतेची काळजी घेतल्यास अशा मोहिमा राबविण्याची वेळ येणार नाही, अशी टीका केली. अर्थात, आपल्याकडील एकूणच मानसिकता लक्षात घेता, विशेषत्वाने काही मोहिमा हाती घेतल्याखेरीज उद्देशित कामे पार पडत नाहीत. त्यामुळे जे केले गेले ते चांगलेच झाले, फक्त त्याबद्दलची जाणीव रुजविली जाणे गरजेचे आहे. पालकमंत्री महाजन म्हणतात त्याप्रमाणे स्वच्छता हा खरेच सवयीचा भाग आहे. त्यामुळे ही आपल्या स्वत:पासून सुरू करून अंगवळणी पडणे गरजेचे आहे. शिवाय, अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली गेल्याखेरीज ही सवय लागणार नाही. शहरातील कचºयाची ठिकाणे निश्चित करून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याद्वारे अस्वच्छता करणारे शोधण्याचा विचारही महाजन यांनी बोलून दाखविला आहे. तेव्हा, तसे झाले तर खरेच त्याचा परिणाम दिसून येऊ शकेल. विनामूल्य मिळणाºया वस्तूबाबत जसे कुणाला गांभीर्य नसते, तसे कारवाईची अगर दंडाची भीती असल्याशिवाय नागरिकांना शिस्त लागत नाही, हे खरे असल्याने पालकमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतल्यास सुज्ञ नाशिककर त्याचे स्वागतच करतील.