शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ऐन पावसाळ्यात नाशिकरोडला अवघे एक वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 6:30 PM

नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत संतापदोन दिवसात तातडीची बैठक

नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

स्थायी समितीची बैठक सोमवारी (दि.१७) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी आॅनलाईन बैठकीत याविषयावर जोरदार चर्चा झाली. नाशिकरोड विभागाला चेहेडी बंधाºयातून दारणा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. परंतु देवळाली कॅम्प परिसरातील मलयुक्त पाणी चेहेडीत जाते आणि दुषित जंतुयूक्त पाण्यामुळे चेहेडी पंपींग स्टेशनला शुध्दीकरणात अडचणी येतात आणि नाशिकरोड परीसरात दुषीत पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे उन्ह्याळ्यात चेहेडी बंधाºयाची पातळी कमी झाली की, दारणेऐवजी गंगापूर धरणातून नाशिकरोड विभागाला पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी दोन महिने कालावधीत ही समस्या उदभवते. यंदा अपेक्षीत पावसाळा सुरू झालेला नसल्याने अद्यापही गंगापूर धरणातूनच नाशिकरोड भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, सध्या एकवेळ आणि तेही दुषीत पाणी पुरवले जात असल्याने प्रा. शरद मोरे आणि राहूल दिवे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंपदा विभागाला सहा महिन्यांपूर्वीच पत्र देऊन उन्हाळ्याच्या अखेरीस आधी वालदेवीचे पाणी येऊन गेल्यानंतर दारणाचे आवर्तन सोडा अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिली. त्याच बरोबर गंगापूर धरणातून पाणी घेताना ते सध्या अपुरे पडत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात दोन दिवसात नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याची सूचना केली.

दरम्यान, चेहेडी बंधाºयात ज्या ठिकाणी वालदेवी नदीचे पाणी येते, त्याच्या वरील बाजूने दारणा नदीत जलवाहिनी टाकून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव आहे. मनपाने पाणी पुरवठा विभागाने या जलवाहिनीसह अन्य पाणी योजनांचा एकुण २२७ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र तो प्रलंबीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प