मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 14:51 IST2018-09-17T14:50:26+5:302018-09-17T14:51:16+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा जवळील उंबरमाळी येथे भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
कसारा - मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा जवळील उंबरमाळी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तर पाच जण जखमी झाले आहेत. उंबरमाळीजवळ आयशर टेम्पो व सुमोचा सोमवारी (17 सप्टेंबर) सकाळी अपघात झाला.
टेम्पो चालकाने अचानक ब्रेक दाबून टेम्पो रस्त्यातच थांबवल्याने मागून येणारी सुमो गाडी टेम्पोवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा सुमोमधील छत्रभुज रणयेवले यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये त्यांची पत्नी संगीता छत्रभुज रणयेवले ,मुलगा तुषार, मुली प्रिया व प्रिती यांच्यासह सुमो चालक जितेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कसारा पोलिसांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.