शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

टमाटा दीड रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:58 PM

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.दिंडोरी तालुक्यात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टमाटा पिकाला उतरती कळा लागली असून निर्यातक्षम टमाटा चार रु पया ते सहा रूपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल व गारशेल (कवडी फुटलेला ) टमाटा प्रती किलो दिड ते दोन रु पये व प्रति कॅरेट तिस ते ऐंशी रु पये एवढा भाव मिळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .दिंडोरी तालुक्यात टमाटापिकाची लागवड पांडव पंचमीला पिकाची मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी टमाटा लागवडीच्या वेळीच परतीच्या पावसामुळे रोपे खराब झाली. त्यानंतर बळीराजाने एक रु पये तिस पैसे प्रमाणे एका टमाटा रोपाच्या काडीला मोजून टमाटा लागवड केली . लागवड केलेला टमाटा सतत कोसळणाºया पावसामुळे खराब झाला. काही भागातील टमाटा वाचविण्यासाठी बळीराजाला अतोनात मेहनत करावी लागली . पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी , धुरळणी करून एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला .टमाटा मार्केटला गेल्यानंतर आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात प्रति कॅरेट (विस किलो ) सातशे ते आठशे रु पये बाजार मिळत होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात १०० पासून ते ३०० रूपयांपर्यंत टमाटा व्यापारी खरेदी करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला अमोनिया , सम्राट या सारखी महागडी खते वापरून खराब झालेल्या टमाट्याला जीवदान दिले. परंतु डिसेंबर महिन्यात प्रारंभीच टमाट्याला दिड ते दोन रु पये किलो भाव मिळू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक