शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

कालवा समितीच्या बैठका जिल्ह्यांतच होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 8:30 PM

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार ...

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करतील, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.१८) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कालवा समितीच्या बैठकांमध्ये स्थानिक आमदारांना विचारात घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे असते. असे सांगतानाच जलसंपदामंत्र्यांकडे मुंबईत बैठक घेतली जात असल्याने ही पद्धत बदलली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री भुजबळ यांनी या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगताना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात यापूर्वी मुंबईत जलसंपदामंत्र्यांकडे बैठका घेण्यास सुरुवात झालेली होती. तसा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. परंतु आता लवकरच या संदर्भातील फेर आदेश निघणार असून, जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच अशा बैठकांना पुन्हा सुरुवात होईल, अशी शक्यता भुजबळ यांनी वर्तविली.दरम्यान, पाणी नियोजनासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमदारांचा सहभाग आणि भूमिका महत्त्वाची असल्याने आमदरांनाच कालवा समितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणीदेखील काही आमदारांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणीच अशा बैठका होणार घेण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण