शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

हाताला काम नाही अन् शेतात पीकही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST

पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला असून, सुरुवातीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लावणी केलेले नागली व वरई ही दोन्ही पिके ऐन वेळी पावसाने दडी मारल्याने रोपांच्या अक्षरश: काड्या झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यावर ऐन पावसाच्या दिवसात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, आधीच कोरोनाचे संकट डोक्यावर असताना आता खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरवर्षी भात व नागलीची लावणीनंतर बहुतांश शेतकरी मजुरीसाठी स्थलांतरित होतात. मात्र लॉकडाऊन-मुळे हाताला काम नाही व शेतात पीक नाही अशी गत झाली आहे. पर्यायी पिकांची चाचपणी भात किंवा नागलीचे पीक लावणीनंतर साधारण ९० ते १२० दिवसात येते. त्यातील ५५ दिवस उलटून गेल्याने आता लावणी करूनही उत्पादन येईल याची शाश्वती नसल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाया जाणार आहेत.शिवाय रोपे नसल्याने दुबार लावणी शक्य नसल्याने उर्वरित ४० ते ४५ दिवसात येणाºया पर्यायी पिकांची चाचपणी करण्याची मागणी होऊ लागली असून, कृषी विभागाने या संदर्भात मार्गदर्शन करून कमी कालावधीत व हवामानानुसार कोणती पिके घेता येतील त्याची बियाणे मोफत वाटप करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.-------------------------जून महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने माळरानावर नागली व वरईची लावणी केली; मात्र जुलैमध्ये कडक ऊन पडल्याने पूर्ण रोपे जळून खाक झाली असून, बियाणे, खते, मजुरी सर्व खर्च वाया गेला आहे. या वर्षी कोरोनामुळे ना शेती करता येत ना मजुरीला जाता येत, अशी शेतकरी व मजुरांची बिकट स्थिती झाली आहे.- जितेंद्र मोहरे, कळमबारी

टॅग्स :Nashikनाशिक