शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पाणीकपात नाही !

By admin | Updated: October 28, 2016 23:25 IST

मुबलक साठा : जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय

नाशिक : बरोबर वर्षभरापूर्वी मराठवाड्यातील जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद पेटलेला होता. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू केली होती. १ ते ५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाचा भडका उडाला, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे आंदोलकांची कोंडी झाली. त्यानंतर जुलै २०१६ अखेरपर्यंत नाशिककरांनी पाणीकपातीचा सामना केला. यंदा, मात्र गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के पाणीसाठा असल्याने आणि मराठवाड्यात वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने नाशिककरांना मागीलवर्षाप्रमाणे पाणीकपातीला सामोर जावे लागणार नाही. सन २०१५ मध्ये सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घोषित केला व त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली होती. महापालिकेने पाणीबचतीसंदर्भात नियोजन करताना मनपाचे जलतरण तलावही बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापालिकेकडून पाणीकपात सुरू झालेली असतानाच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि तेथूनच पाणीप्रश्न अधिकच पेटला. शेतकऱ्यांची आंदोलने, धरणावर ठिय्या, आमदारांच्या घरासमोर घंटानाद अशी आंदोलने झालीत. पाणी आरक्षणाची बैठकही लांबवण्यात आली. अशा साऱ्या वातावरणात जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करत गंगापूरमधून २७००, तर दारणातून ३०० दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. त्यामुळे पाणीकपात वाढविण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय उरला नाही. पुढे जुलै २०१६ अखेरपर्यंत महापालिकेने आठवड्यातून दोन वेळा पाणीकपात करत पुरून-पुरून पाणी वापरले. (प्रतिनिधी)गंगापूर धरणात ९३ टक्के पाणीसाठाशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ आॅक्टोबर अखेर ५२३३ दलघफू म्हणजे ९३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७० टक्के होता, तर समूहातील कश्यपी धरणात यंदा ९९ टक्के, गौतमी गोदावरीत ९३ टक्के, आळंदी धरणात १०० टक्के आणि दारणा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट नाही. महापालिकेने यावर्षी गंगापूर धरणातून ४२००, तर दारणातून १०० दलघफू पाणी आरक्षण मागितले होते, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत गंगापूर धरणातील ३९०० तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेमार्फत शहरात रोज ४१० दसलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीकपातीचे संकट झेलणाऱ्या नाशिककरांवर मात्र यंदा वरुणराजा मेहरबान झाला आणि आॅगस्टमधील पावसानेच धरणे भरली गेली. परतीच्या वेळी पावसाने मराठवाड्यावरही कृपावृष्टी केल्याने जायकवाडीसह बहुतांश धरणे ८० टक्क्यांवर भरली. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी २८ आॅक्टोबरअखेर अवघा ६ टक्के इतका होता. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदा गंगापूरमधून पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याने पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.