शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील नेपाळी बांधव अस्वस्थ

By admin | Updated: April 26, 2015 01:07 IST

नाशिकमधील नेपाळी बांधव अस्वस्थ

  नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे काठमांडूमध्ये प्रचंड जीवितहानी झाल्याचे वृत्त पसरताच शहरातील नेपाळी बांधवांमध्ये दिवसभर चिंता व्यक्त केली जात होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती जाणून घेत होते. दरम्यान, काहींचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. शनिवारच्या सकाळी ८० वर्षांतील सर्वांत मोठ्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्याने नेपाळ हादरले. या भूकंपामध्ये राजधानी काठमांडूमधील धरहरा टॉवर, दरबार चौक या ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या. ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेने भूकंपाचे हादरे बसल्याने प्रचंड प्रमाणात हानी झाली. दरम्यान, यामुळे शहरातील नेपाळी बांधव आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते, तर ज्यांचा संपर्क होऊ शकला नाही, अशांनी नेपाळकडे जाण्यासाठी थेट नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले. मात्र लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या १५ मेपर्यंत फुल्ल असल्याने त्यांना तिकीट मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरली होती, तर काहींना रडू कोसळले होते. दरम्यान, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिकरोड भागात सर्व नेपाळीबांधव एकत्र जमले होते. सकाळीच याबाबतचे वृत्त कळाल्याने बहुतेकांनी कामावर न जाता कुटुंबीयांशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचे काम सुरू होते. शहरात तीन हजारांपेक्षा अधिक नेपाळी बांधव आहेत.