शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अखेरच्या दिवशी आठवले शाळेचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 8:46 PM

गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.

ठळक मुद्देदहावीची परीक्षा : पाणावलेले डोळे अन् गळाभेटसारेच झाले भावूक, पालकही हळहळले

नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला कलाटणी देणारी दहावीची परीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची असते. गुरुवारी दहावीचा अखेरचा पेपर संपला आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना निकालासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकीकडे दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा आनंद असताना दुसरीकडे शालेय आयुष्याचा उंबरठा ओलांडल्याचे दु:खदेखील व्यक्त करण्यात आले. विशेषत: पालक अधिक भावुक झाले होते. डोळ्यासमोर पहिलीत घातलेली मुले आज दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडल्याने त्यांच्यासमोर आपल्या पाल्याचा शालेय जीवनातील पटच उभा राहिला.शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. परीक्षा संपून विद्यार्थी बाहेर येताच विद्यार्थी शिक्षकांपुढे झुकले आणि चरणस्पर्श करीत त्यांचा निरोप घेतला. या भावुकप्रसंगी अनेक शिक्षिकांचे डोळेदेखील पाणावले, तर शाळेतील अनेक मैत्रिणींनी साश्रू नयनांनी एकमेकींना निरोप दिला. निरोपाचा हा भावनिक खेळ एकीकडे सुरू असताना जवळच्याच स्नॅक्स, ज्युस दुकानांसमोर छोटेखानी पार्टी करून काहींनी आनंदोत्सवदेखील साजरा केला.परीक्षा केंद्रातून विद्यार्थी बाहेर आल्यानंतर शाळेच्या आवारातच परीक्षेचा अखेरच्या दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करीत एकमेकांचे अभिनंदन केले. पालकही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही इतर पालकांबरोबर यापुढे भेट होणार की नाही म्हणून तेही एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत हस्तांदोलन करीत गळाभेट घेत होते. शाळेच्या आवारात अशाप्रकारचा स्नेहसोहळा अनेक ठिकाणी दिसून आला. परीक्षेनंतरही बराच वेळ गर्दी असल्याने काही शाळांना ध्वनिक्षेपकावर शाळेचे आवार सोडण्याचे आवाहन करावे लागले.--कोट--शाळेला आणि गणवेशालाही अलविदागेल्या दहा वर्षांपासून आम्ही शाळेचा गणवेश परिधान करीत होतो. आज या गणवेशाचादेखील अखेरचा दिवस आहे. शाळा सुटली, गणवेशही सुटला, उद्यापासून शाळेचा गणवेश परिधान करता येणार नाही. परंतु शाळेची आठवण म्हणून गणवेश जपून ठेवणार आहे.- साक्षी सोनवणे, विद्यार्थिनी

 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा