शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कसारा घाटाजवळ भीषण अपघात, दोन महिलांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 2:47 PM

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ सोमवारी (20 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघात झाला.

- शाम धुमाळ कसारा -  मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ सोमवारी (20 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघात झाला. लतिफवाडी गावाजवळ एका भरधाव टँकरने रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारला धडक देऊन पिक-अप बोलेरो गाडीवर आदळला. या भीषण आपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिला रस्त्याशेजारी उभ्या राहून चहा पित होत्या. या दोघींनाही धडक देऊन भरधाव टँकरनं त्यांना 50 फूट अंतरावर फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की,महिलांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले. दरम्यान, जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून नाशिककडे निघालेल्या कारमधील (क्रमांक MH 02 EP 9119) मंडळी लतिफवाडीजवळ एका ढाब्यावर चहापाणी घेण्यासाठी थांबली असता भरधाव येणाऱ्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला व टँकरची कार व बोलेरो गाडीला धडक बसली.   

मदतीसाठी धावले देवदूत दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गृपचे सदस्य, पिक इन्फ्रा पेट्रोलिंगचे सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. या मदत कार्यामुळे तीन जणांवर वेळीचे उपचार करणे शक्य झाले. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस व महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदण जाधव, पी.एस.आय डगळे पुढील तपास करत आहेत.  

अपघाती क्षेत्राकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष दरम्यान कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेला लतिफवाडी परिसर हा अपघाती क्षेत्र असून या ठिकाणी वर्षभरात आतापर्यंत आठ बळी  गेले आहेत. तर 50हून अधिक जखमी झाले आहेत. या क्षेत्रात रस्त्यांवर पांढरे पट्टे तसेच स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी अनेकदा तक्रारी करुन देखील पिक इन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिरुद्ध सिंग तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNashikनाशिक