शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

भारत विकासात चीनच्या पुढे, हा गैरसमज

By admin | Updated: April 11, 2015 00:30 IST

नरेंद्र जाधव : क. का. वाघ स्मृती व्याख्यानात केले प्रतिपादन

नाशिक : भारताने आर्थिक विकासात चीनला मागे टाकल्याची वृत्ते मूर्खपणाची असून, चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या पाचपट आहे. आपण या वर्षी केवळ चीनएवढा विकासदर गाठला असून, चीनला मागे टाकण्यासाठी कित्येक वर्ष लागणार असल्याचे वास्तव ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेच्या वतीने कर्मवीर वाघ स्मृती व्याख्यानमालेचे बारावे पुष्प शंकराचार्य संकुलात गुंफण्यात आले. पुणे विद्यापीठ उपविभागीय केंद्राचे समन्वयक प्रा. रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव यांनी ‘भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतिबिंब : सन २०२० पर्यंत’ या विषयावर विवेचन केले. भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, बदल व आव्हाने अशा तीन टप्प्यांत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सन १९४७ पर्यंत भारताचा विकासदर शून्य टक्के होता. १९५१ पासून भारताने नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली.१९९१ पर्यंतच्या चाळीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली; मात्र १९७० ते ८० या काळात देशात परमीट राज बोकाळले. त्यामुळे उद्योगांच्या विकासाला खीळ बसली. परकीय गंगाजळी आटून देश प्रचंड आर्थिक संकटात सापडला. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी परमीट राज बंद करून मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे साडेतीन टक्क्यांवर अडून बसलेला देशाचा विकासदर ९ टक्क्यांवर पोहोचला. २००१ मध्ये भारत व चीन हे दोन देश प्रथमच जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटले; मात्र भारताने चीनवर मात केली, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एस. भंडारी यांनी परिचय करून दिला. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे. जी. सुलक्षणे व एन. एस. रंधवे यांनी सूत्रसंचालन केले. वाय. डी. जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)