शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शोकमग्न वातावरणाच लागला निकाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST

मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील मणियार समाजातील वऱ्हाडी मंडळी ताज लक्झरी बसने गुजरातला गेले; परंतु रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ...

मालेगाव : शहरातील शब्बीरनगर भागातील मणियार समाजातील वऱ्हाडी मंडळी ताज लक्झरी बसने गुजरातला गेले; परंतु रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले; मात्र तरीही दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात ‘निकाह’ पार पाडण्यात आला.

शब्बीरनगरमधील हाजी शेख अहेमद शेख भिकन यांचा मुलगा मुद्दस्सीर शेख याचा विवाह सूरतच्या शेख खलील गनी मणियार यांची मुलगी सुमैय्याबी हिचे बरोबर ठरला होता. लग्नापूर्वीचे सवर विधी आटोपून साधेपणाने विवाह करण्याचे ठरले. त्यानुसार शब्बीरनगरमधील गल्लीतील शेजारी कुणालाही बरोबर नेले नाही. केवळ पिलखोड आणि धुळे येथील निवडक नातलगांना घेऊन एका ट्रॅव्हल्स्‌मधून ‘वऱ्हाडी’ सूरतला जात होते. रस्त्यात झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले, तर सातजण जखमी झाले. नववधूच्या घरी अपघाताचे वृत्त कळताच शोककळा पसरली. जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. घरातील ज्येष्ठ मंडळींनी तशातच साधेपणाने विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुद्दशीर आणि सुम्मैया यांचा निकाह लावण्यात आला. यावेळी मात्र वऱ्हाडासह दोन्ही बाजूंच्या नातलगांनी हंबरडा फोडला. हाजी अहमद शेख यांचे शब्बीर नगरात जिलेबी, भजीचे हॉटेल आहे. त्यांना तीन मुले असून, तिन्ही मुले रिक्षा चालवितात. घरात पहिलेच लग्न असल्याने आनंदाचे वातावरण होते. पहाटे एक वाजता वऱ्हाड सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, ‘वऱ्हाडी’च्या नशिबी काय लिहिले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. परंतु नियतीने अखेर घाला घातलाच.

इन्फेो;

कारागीर हॉटेलवरच

शब्बीर नगरातील हाजी अहमद यांच्या हॉटेलवर गेल्या अनेक वर्षांपासून कारागीर काम करीत आहे; मात्र त्यांनाही नेण्यात आले नव्हते. तो आज हॉटेल सांभाळत असताना त्याला ‘अपघाता’ची खबर मिळाली. तोही धाय मोकलून रडू लागला. दुपारी घराजवळ गर्दी जमायला सुरुवात झाली अन्‌ सर्व सूरतला फोन लावून हालहवाल विचारत असल्याचे दिसून आले.